Delhi Earthquake – दिल्ली-NCR मध्ये पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के, लोकं घाबरून घराबाहेर धावली

Delhi Earthquake – दिल्ली-NCR मध्ये पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के, लोकं घाबरून घराबाहेर धावली

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंप झाला असून रिक्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 4.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. साखर झोपेत असलेल्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरून घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरून घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचं व्हिडीओ समोर आले आहेत.

यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी दिल्लीजवळच असल्याने अनेक वेळ जमीन हालत होती. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिल्लीला जोरदार धक्के जाणवले.

भूकंपानंतर दिल्ली पोलिसांनी 112 हा हेल्पलाइन नंबर देखील जारी केला आहे. भूकंपाचे धक्के तीव्र असले तरी, अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

 

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे...
तारीख पे तारीख! देशभरातील न्यायालयांमध्ये 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक, चौकशीसाठी अल्पवयीन मुलगा ताब्यात
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, मुख्यमंत्री मात्र मौन – सुनील प्रभू
विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी मतदान प्रकिया
थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी