महाराष्ट्रातील 6 हजार मराठीप्रेमी दिल्लीच्या साहित्यमेळ्यात  जाणार, राज्यातील अडीच हजार साहित्यप्रेमींचा सहभाग

महाराष्ट्रातील 6 हजार मराठीप्रेमी दिल्लीच्या साहित्यमेळ्यात  जाणार, राज्यातील अडीच हजार साहित्यप्रेमींचा सहभाग

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अवघे पाच दिवस उरले आहे.  येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये मायमराठीचा उत्सव होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून किमान  दोन ते अडीच हजार साहित्यप्रेमी दिल्लीत पोहचणार आहेत. याशिवाय दिल्लीतील स्थानिक मराठी जनांचा मोठा सहभाग असेल. तब्बल सहा ते साडेहजार मराठी जनांच्या उपस्थितीत दिल्लीत साहित्यमेळा पार पडणार आहे.

सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. संमेलनासाठी पुण्यातून 19 फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव विशेष रेल्वेला देण्यात आले असून त्याला 16 बोगी आहेत. प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्पृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. स्पेशल ट्रेनमधून सुमारे 1200 लोक दिल्लीत पोहचणार आहेत. संमेलनासाठी 450 ते 500 प्रतिनिधी नोंदणी झाल्याचे समजते. याशिवाय महाराष्ट्रातून स्वतंत्रपणे साहित्यप्रेमी दिल्लीत पोहचणार आहेत.

राज्याच्या गावागावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा, तरुणांचा मोठय़ा संख्येने समावेश असणार असल्याचे सरहद पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक; मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं? मोठी बातमी समोर
मोठी बातमी समोर येत आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे...
तारीख पे तारीख! देशभरातील न्यायालयांमध्ये 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक, चौकशीसाठी अल्पवयीन मुलगा ताब्यात
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे यांचा घणाघात
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, मुख्यमंत्री मात्र मौन – सुनील प्रभू
विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी मतदान प्रकिया
थकीत देण्यांच्या बोजाने एसटी वाकली, अर्थसंकल्पात आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी