Pahalgam Attack – संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

Pahalgam Attack – संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. या 26 लोकांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण देश आणि राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध एकत्र आहेत. दहशतवाद्यांवर आणि त्यांचा मालक पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी केली जात. याचदरम्यान, आता काँग्रेस पक्षाने पहलगाम हल्ल्याबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले आहेत की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे प्रत्येक हिंदुस्थानी संतापला आहे. या महत्त्वाच्या वेळी हिंदुस्थानने दाखवून दिले पाहिजे की, आपण नेहमीच दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहोत. विरोधी पक्षांना असा विश्वास आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, जिथे लोकप्रतिनिधी त्यांची एकता आणि दृढनिश्चय दाखवू शकतील. आमची विनंती आहे की, विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावण्यात यावे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला खूप घाम येत असतो. त्यात घामामुळे डोक्यातील स्कॅल्पला खाज येण्याची समस्या अनेकदा उद्भवते. कधीकधी ही खाज...
benefits green chillies: हिरवी मिरची नाही, गुणांचा खजिना म्हणा साहेब..! फायदे जाणून अश्चर्यचकित व्हाल
शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय?
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांची नियुक्ती, 14 मे रोजी घेणार शपथ
IPL 2025 – फाफ डू प्लेसिस एकटाच भिडला; फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले, कोलकाताचा 14 धावांनी विजय
बोगस कर्जमाफी प्रकरण : मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर गुन्हा दाखल
नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ