पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का बसला, नेहा खानने हिंदू धर्म स्वीकारला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का बसला, नेहा खानने हिंदू धर्म स्वीकारला

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश शोकसागरात बुडाला होता. 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेल्यामुळे सर्व स्तरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. या हल्ल्यामुळे गाझियाबादमधील एक मुस्लीम तरुणी सुद्धा हादरून गेली आणि तीने इस्लाम धर्मातून बाहेर पडत हिंदू धर्म स्वीकारला आहे. यावेळी प्रत्येक मुसलमान दहशतवादी वाटत असल्याचेही ती म्हणाली आहे.

नेहा खान असं या तरुणीचे नाव आहे. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ती व्यथीत झाली होती. त्यामुळेच तिने धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू रक्षा दलाच्या मदतीने धार्मिक विधी आणि रितीरिवाज पूर्ण करत नेहाने हिंदू धर्म स्वीकारला आहे. धर्म परिवर्तन झाल्यानंतर नेहा खानने आपले नाव बदलून नेहा शर्मा असं केलं आहे. “पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मला हादरून टाकलं आहे. ज्या प्रकारे हिंदुंना धर्म विचारून मारण्यात आलं, त्यामुळे मला जाणवू लागलं आहे की, मुस्लिम धर्म आता दहशतवादाचा पर्याय बनला आहे. प्रत्येक मुसलमान दहशतवादी वाटू लागला आहे. याच भावनिक धक्क्यामुळे मी सनातन धर्माचा स्वीकार करत आहे, असं नेहा म्हणाली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला नाही परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला नाही
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच दोन लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत शिफारशी सादर करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन केला...
चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळय़ाचा गळा आवळला
वर्धा जिह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल
benefits green chillies: हिरवी मिरची नाही, गुणांचा खजिना म्हणा साहेब..! फायदे जाणून अश्चर्यचकित व्हाल
शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय?
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांची नियुक्ती, 14 मे रोजी घेणार शपथ