रत्नागिरीच्या रनपार समुद्रात बोट बुडाली, 16 जणांना वाचवण्यात यश

रत्नागिरीच्या रनपार समुद्रात बोट बुडाली, 16 जणांना वाचवण्यात यश

रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील परशुराम जयंती उत्सवानिमित्त रनपार गावात आलेले काही जण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते. अचानक फिनोलेक्स जेटीच्या समोर त्यांची बोट बुडाली. यावेळी फिनोलेक्स कंपनीची नौका आणि पूर्णगड सागरी पोलीस ठाणे सागरी कवच अभियानाचे अंमलदार आणि बीएसएफ जवान यांच्या मदतीने बोटीवरील बुडणार्‍या 16 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र बोट पाण्यात बुडाली. ही घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सागरी कवच अभियान सुरू आहे. या माध्यमातून समुद्रकिनार्‍यावरती मोठ्या प्रमाणात गस्त सुरू आहे. ही गस्त सुरू असताना दुपारी 3 च्या सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती नावाची बोट घेऊन काहीजण फिरण्यासाठी रनपार खाडी परिसरात निघाले होते. यादरम्यान सागरी कवच अभियान सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आले, की फिनोलेक्स जेटीच्या समोर बोट बुडत आहे. त्यांनी तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या दोन मैलांच्या सहाय्याने घटनास्थळी जाऊन बुडणार्‍या 16 जणांना वाचवले. बोट मात्र पाण्यात बुडाली. त्यानंतर त्या 16 जणांना सुखरूप किनार्‍यावरती आणण्यात आले.

हे मदतीला धावले

बोट बुडत असल्याचे पाहून फिनोलेक्स कंपनीचे सुरक्षा विभागाचे मेजर सुमेध कुलकर्णी यांनी तात्काळ पायलट नौका पाठवली. या मदत कार्यात फरीद तांडेल, शिवकुमार, सुरज सिंह, विजय वाघंब्रे, अपूर्ण जाधव, मुस्ताकिन शेख, ध्रुव आणि रघुनाथ घाटगे यांनी सहभाग घेत 16 जणांचे प्राण वाचवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला नाही परकीय गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्यांचे दिवास्वप्नच, टास्क फोर्सला मुदतीत अहवाल सादर करता आला नाही
महाराष्ट्रात परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याबरोबरच दोन लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत शिफारशी सादर करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन केला...
चौथी मुलगी झाली म्हणून पोटच्या गोळय़ाचा गळा आवळला
वर्धा जिह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल
benefits green chillies: हिरवी मिरची नाही, गुणांचा खजिना म्हणा साहेब..! फायदे जाणून अश्चर्यचकित व्हाल
शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय?
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांची नियुक्ती, 14 मे रोजी घेणार शपथ