पुण्यातील भोर तालुक्यात चार गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यात चार गावांतून पाण्याच्या टँकरची मागणी

या वर्षी पुरेसा पाऊस होऊनही भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वारवंड, शिळीम, तर पुणे-सातारा महामार्गालगत करंदी खेडेबारे, साळवडे या गावांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या चारही ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टँकरची मागणी केली असून, यातील साळवडे व करंदी खेडेबारे या गावांना पाण्याच्या टँकरची मंजुरी मिळाली आहे, तर पाण्याच्या टैंकरबाबत वारवंड व शिळीम या दोन गावांची पाहणी होणार आहे, अशी माहिती भोर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

करंदी खेडेबारेमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत नसल्यामुळे आणि ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत पाणी योजनेचे काम रखडल्यामुळे काही वर्षांपासून लोकांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पाण्यासाठी स्थानिकांमध्ये वाद, तंटे, भांडणे झाल्याचे पाहायला मिळते. पाण्यासाठी महिला-पुरुषांना तीन किलोमीटर पायपीट करावी लागते.

पुणे-सातारा महामार्गावरील करंदी खेडेबारे येथील जलस्रोत आटल्यामुळे मागील महिन्यापासून गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी योजनेच्या विहिरीतील पाणी आटले. त्यामुळे नळाचे पाणी बंद झाले. सध्या गावचे सरपंच नवनाथ गायकवाड यांनी एका उद्योजकाच्या मदतीने टँकर सुरू केला आहे. तसेच स्थानिक नेते कुलदीप कोंडे यांच्यामार्फत पाण्यासाठी टँकर येत आहे.

‘जलजीवन’ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये मंजूर झाले; परंतु गावामध्ये नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्यामुळे जवळच्या दिवडी गावातील तलावातून पाणी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्यामुळे पुढील काम रखडले आहे. त्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत, असे करंदी खेडेबारेचे सरपंच नवनाथ गायकवाड यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी दुर्घटना! दिल्लीत रहिवासी इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती मोठी दुर्घटना! दिल्लीत रहिवासी इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
राजधानी दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील दयालपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या शक्ती विहार भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्री रहिवासी इमारत कोसळली....
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण