भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो – राहुल गांधी

भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो – राहुल गांधी

भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोडासा जिल्ह्यातील अरवली येथे पोहोचले आहेत. यावेळी बीएपीएस स्वामीनारायण मंदिर सभागृहात जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, “सध्याची लढाई केवळ राजकीय नाही तर ती भाजप-आरएसएस आणि काँग्रेसमधील वैचारिक लढाई आहे. संपूर्ण देशाला माहित आहे की, जर कोणी भाजपला हरवू शकतो तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे. जर आपल्याला देशात आरएसएस आणि भाजपला पराभूत करायचे असेल तर तो मार्ग फक्त गुजरातमधून जातो.”

कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपल्या पक्षाची सुरुवात गुजरातमध्येच झाली. तुम्ही आम्हाला महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे महान नेते दिले. बऱ्याच काळापासून गुजरातमध्ये आपल्या हाती फक्त निराशाच आली आहे. मात्र मी तुम्हाला खात्री देण्यासाठी आलो आहे की, काहीही कठीण नाही.”, असं म्हणत त्यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणूक जिकंण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे घर 17 लाखांवर