मानवतला मृत व्यक्तीवर गुन्हा; पोलीस, गृहखात्याचा अजब कारभार

मानवतला मृत व्यक्तीवर गुन्हा; पोलीस, गृहखात्याचा अजब कारभार

राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले. या गृहखात्याचा कारभार पोलीस हाकत आहेत. मानवतमध्ये याच पोलिसांनी चक्क मृत व्यक्तीवर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल करून गृहखाते किती जागरूक आहे, याचे उदाहरण दिले आहे. यापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलनकर्त्याला पोलीस कोठडीत मारून ठार केल्याचा प्रताप राज्यभर गाजत आहे. मात्र, गृहमंत्री पोलिसांवर अभय देण्याचे कार्य चोखपणे सांभाळत आहेत.

शहर आणि परिसरात सध्या मानवत पोलिसांची गजब कारवाई चर्चेत आहे. 1 एप्रिल रोजी रत्नापूर येथील एका मृत व्यक्तीविरुद्ध तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल झाला. मृतात्म्यावर गुन्हा कसा काय दाखल झाला? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी पान शॉपचालकाविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार शेख गाझीयोद्दीन शेख हबीब ऊर्फ मन्नू यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत रामकृष्ण बलभीम ताकट (रा. रत्नापूर) हा गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात त्याच्या पान शॉपमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असताना आढळून आला असल्याचे म्हटले आहे. यावेळी आरोपीकडून २५० रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आल्याचेही म्हटले आहे. प्रकरणाचा तपास नारायण सोळंके करत आहेत. मात्र, अद्याप आरोपी अटक केलेला नाही. तपास अधिकाऱ्याला त्यांच्या सेवाकाळात हा आरोपी सापडणे शक्य नाही. कारण ज्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या व्यक्तीने फेब्रुवारी १९९७रोजी आत्महत्या केली होती. तशी कागदपत्रेही ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत.

एरव्ही शहरात तंबाखूजन्य पदार्थ ज्यात गुटखा मोठ्या प्रमाणावर येतो. ही वाहतूक करणारे आरोपी पोलिसांना सापडतच नाहीत. परंतु, उघड गुपित असणारे पान टपरीचालक मात्र पोलिसांना नेमकेपणाने दिसतात. नुकतीच स्थानिक गुन्हे शाखेने पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे तंबाखूजन्य गुटख्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 16 लाख रुपयांचा केवळ गुटखा जप्त केला. यापूर्वीही स्थानिक गुन्हे शाखेने पाथरी व मानवत परिसरात हजारो रुपयांची देशी व विदेशी दारू मोठ्या बॉक्समध्ये भरून वाहतूक करीत असताना पकडली. परंतु, ही कारवाई मानवत पोलिसांना करणे कधीही शक्य झाले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार Pahalgam Terror Attack : त्या एक दोन तासात काय घडलं? हर्षल लेले यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे....
YMCA ची 150 वर्षे पूर्ण, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन थाटामाटात साजरा होणार
Pahalgam Terror Attack हो चूक झाली! केंद्रीय मंत्र्यांनी दिली कबूली, सर्व पक्षीय बैठकीनंतर केला खुलासा
सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्यात सापडले पांढऱ्या रंगाचे बिबट्याचे पिल्लू
Pahalgam Attack – सरकारच्या प्रत्येक अ‍ॅक्शनला आमचं समर्थन, सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांचं वक्तव्य
दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना लिफ्ट बंद पडली, महिला रुग्णाचा गुदमरून मृत्यू