सीबीएसई पॅटर्न हा एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव, सुप्रिया सुळे यांचा आरोप शिक्षणमंत्र्यांना लिहिले पत्र

सीबीएसई पॅटर्न हा एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव, सुप्रिया सुळे यांचा आरोप शिक्षणमंत्र्यांना लिहिले पत्र

महाराष्ट्रात सीबीएसई बोर्डाचा पॅटर्न राबवून एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव राज्य सरकार आखत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे.

सुळे यांना पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा असून ती बाजूला ठेवून सीबीएसई बोर्डाच्याअनुकरणाकडे होणारी वाटचाल अत्यंत वेदनादायक आहे. राज्याचे अस्तित्व दाखवणारे एसएससी बोर्ड (SSC Board) पूर्ण बंद करणे हाच उद्देश असावा, असे दिसते. महाराष्ट्राला संत- समाज सुधारकांची फार मोठी परंपरा आहे. संतांनी लोकशिक्षणाचे काम त्यांच्या अभंगांतून आणि कीर्तनातून केले आहे. असे असताना अन्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करताना अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी

भाषेला कितपत सन्मानाचे स्थान मिळेल ही शंकाच आहे. हा निर्णय मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला मारक असून ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रतल्या शाळांना ’सीबीएसई ’ पॅटर्न कशासाठी? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक होत नसल्याने शिक्षक आत्महत्या करत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत देखील मोठया प्रमाणावर विविध संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील विचारवंत यांनी नकारात्मक भूमिका घेऊन त्यातील तांत्रिक दोष दाखवून देखील शिक्षण व्यवस्था आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात स्थलांतरित होऊन आलेल्या पालकांच्या गावाकडे जाण्याच्या नियोजनात बदल होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे आणि होणारी गैरसोय देखील सहन करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पत्रात केली आहे.

हा निर्णय मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला मारक असून ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रतल्या शाळांना ’सीबीएसई’ पॅटर्न कशासाठी? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाबी, पुरेशा भौतिक सुविधा उपलब्ध, पुरेशी शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक होत नसल्याने शिक्षक आत्महत्या करत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत देखील मोठय़ा प्रमाणावर विविध संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील विचारवंत यांनी नकारात्मक भूमिका घेऊन त्यातील तांत्रिक दोष दाखवून देखील शिक्षण व्यवस्था आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात स्थलांतरित होऊन आलेल्या पालकांच्या गावाकडे जाण्याच्या नियोजनात बदल होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे आणि होणारी गैरसोय देखील सहन करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व घटकांची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पत्रात केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सभागृहाचा सन्मान राखा; निलेश राणे यांना विधानसभा अध्यक्षांची समज सभागृहाचा सन्मान राखा; निलेश राणे यांना विधानसभा अध्यक्षांची समज
विधानसभेत आज शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव व आमदार नीलेश राणे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध झाले. शिंदे गटाचे सदस्य नीलेश राणे...
मुंबईत होतेय गुजरातमधील गुटख्याची खुलेआम विक्री, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले
एम. एफ. हुसेन यांच्या पेंटिंगची 118 कोटींना विक्री, न्यूयॉर्कच्या लिलावात रचला इतिहास
आता शहरातील कुपोषित माता-बालकांनाही मिळणार पोषण आहार, वाढीव निधीसाठी केंद्र सरकार सकारात्मक
उपनगरासाठी घरदुरुस्ती मंडळाची स्थापना करा, सुनील प्रभू यांची आग्रही मागणी
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
प्रशांत कोरटकरला अटक होणारच, सोमवारी होणार पुढील सुनावणी