नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

नागपूरमध्ये दंगल उसळली होती. त्यानंतर आता विधानभवनाच्या हिरवळीवर विधिमंडळाच्या दोन्ही सार्वभौम सभागृहांच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या संगीत रजनी आणि स्नेहभोजनाचा आनंद सरकार घेत आहे. आपल्या विखारी आणि प्रक्षोभक वक्तव्यांनी महाराष्ट्राची सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणा-या मंत्र्यांने राज्यसरकारच्या मंत्री आणि आमदारांसाठी पार्टी ठेवली आहे.नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे, अशी टीका काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रोम जळत असताना निरो व्हायोलीन (फिडेल) वाजवत होता. नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे. आज विधानभवनाच्या हिरवळीवर विधिमंडळाच्या दोन्ही सार्वभौम सभागृहांच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या संगीत रजनी आणि स्नेहभोजनाचा आनंद सरकार घेत आहे. आपल्या विखारी आणि प्रक्षोभक वक्तव्यांनी महाराष्ट्राची सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणा-या मंत्र्यांने राज्यसरकारच्या मंत्री आणि आमदारांसाठी पार्टी ठेवली आहे, अशी टीका त्यांनी महायुती सरकारवर केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा – दिलीप वेंगसरकर पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा – दिलीप वेंगसरकर
तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटपटू होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत...
चंद्रपूर जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर
जेएनपीटीला जोडणाऱ्या सहापदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी
दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका
Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…