नागपूर दंगलीवर RSS ची प्रतिक्रिया म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण; नाना पटोलेंची टीका

नागपूर दंगलीवर RSS ची प्रतिक्रिया म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण; नाना पटोलेंची टीका

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये दंगल उसळली. नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून इथूनच संघाचे कामकाज चालते. बंगळुरू येथे संघाच्या प्रवक्त्यांना ‘नागपूरमध्ये झालेली दंगल आणि औरंगजेब मुद्दा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय’ यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर संघाने स्पष्ट भूमिका मांडत औरंगजेबाचा विषय आजच्या काळात सुसंगत नाही, असं म्हटलं आहे. संघाचे प्रवक्ते सुनील अंबेकर म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाज स्वास्थासाठी चांगला नाही. पोलिसांकडून या घटनेची दखल घेतली जात आहे. ते याच्या मूळाशी जातील. यानंतर औरंगजेबाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारला असता आजच्या घडीला तो विषय सुसंगत नाही, असं उत्तर अंबेकर यांच्याकडून देण्यात आलं.

संघाच्या या उत्तरावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसची भूमिका आम्ही त्यातले नाही, असे सांगणारी असून, हे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे, असे नाना पटोले म्हणाले. घटना झालेली आहे. आरएसएसनेच आणलेलं सरकार आहे. आरएसएसने आणलेल्या सरकारमधील मंत्री धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कान का टोचले नाहीत? महाराष्ट्र पेटल्यानंतर आता आम्ही त्यातले नाही, हे सांगणं चुकीचे आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z
दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली...
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका
Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…
मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट, वडिलांची हायकोर्टात धाव
रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितले…
जयंत पाटलांचा ‘तो’ प्रश्न, फडणवीसांचं उत्तर; नितेश राणेंना नेमका काय दिला सल्ला?