‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत दोन सख्ख्या भावांची गोष्ट; कुटुंबातील नाजूक नात्यावर भाष्य
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत दोन सख्ख्या भावांची गोष्ट पहायला मिळणार आहे. थोरला भाऊ वासुदेव आणि लहान यशोधन. यांच्या आयुष्यातील संघर्ष, नात्यांतील तणाव, आणि अहंकाराच्या लढाईत स्वामींच्या लीलांची अद्भुत गुंफण पाहायला मिळते.
वासुदेव कर्तृत्ववान आणि स्वाभिमानी, तर यशोधन, आईच्या प्रेमात गुरफटलेला आणि तब्येतीमुळे दुबळा. या दोन भावांमधील विरोधाभास आणि त्यांच्या कुटुंबातील नाजूक नाती हा कथेचा गाभा आहे.
स्वामी आपल्या लीलांनी या कुटुंबावर कसा प्रभाव टाकतात, कसे बदल आणि समर्पण यांचे सत्य कसे उलगडतात, आणि अहंकाराच्या अंधारातून सत्याच्या प्रकाशाकडे कसा प्रवास घडवतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List