बॉलिवूडला रामराम ठोकत अनुराग कश्यपने सोडली मुंबई, ‘या’ शहरात शिफ्ट होण्याचे कारण काय?

बॉलिवूडला रामराम ठोकत अनुराग कश्यपने सोडली मुंबई, ‘या’ शहरात शिफ्ट होण्याचे कारण काय?

‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या अनेक हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अनुराग कश्यपने मोठा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यपने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. त्याने बॉलिवूड अतिशय विषारी झाल्याचे म्हणत आता मुंबई देखील सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अनुरागने इतका मोठा निर्णय का घेतला? नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अनुराग कश्यपची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने दक्षिण भारतात शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप हा मुंबई सोडून जात असून बंगळुरूमध्ये शिफ्ट होत आहे. त्याने हिंदी चित्रपट उद्योगाबद्दलची आपली निराशा या आधी अनेकवेळा व्यक्त केली होती आणि बॉलिवूडला देखील विषारी म्हणत आपली स्पष्ट भूमिका पुन्हा मांडली आहे.

मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप म्हणाला की, ‘मला फिल्म इंडस्ट्रीतील लोकांपासून दूर राहायचे आहे. हा उद्योग दिवसेंदिवस विषारी बनत चालला आहे. येथील प्रत्येकजण हा अवास्तव असणाऱ्या लक्ष्यांच्या मागे लागला आहे. पुढचा चित्रपट ५०० किंवा ८०० कोटींचा कसा बनेल यासाठी प्रयत्न करत आहे. सर्जनशील वातावरण संपुष्टात आले आहे. मला दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांचा नेहमी हेवा वाटतो. इथून निघून बाहेर जाऊन प्रयोग करणे माझ्यासाठी कठीण आहे. मला त्याची किंमत मोजावी लागेल.’

पुढे अनुराग म्हणाला की, ‘माझे मार्जिन कुठे आहे? असे अनेक प्रश्न विचारले जातात. कारण, चित्रपटाच्या अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे चित्रपट सुरु होण्याआधीच आपण हे कसे विकणार आहोत असा प्रश्न लोकांना पडायला लागला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मितीचा आनंद हरवळून जातो. याच कारणामुळे मला इथून बाहेर पडायचे आहे. पुढच्या वर्षी मी मुंबई सोडून जाणार आहे.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चालकानेच केमिकलच्या सहाय्याने बस पेटवली,हिंजवडीत आगीची दुर्घटना नाही तर घातपात; पगारवाढ न मिळाल्याने भयंकर कृत्य चालकानेच केमिकलच्या सहाय्याने बस पेटवली,हिंजवडीत आगीची दुर्घटना नाही तर घातपात; पगारवाढ न मिळाल्याने भयंकर कृत्य
हिंजवडी आयटी पार्कमध्ये व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रव्हलर बसला आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला धक्कादायक कलाटणी...
‘स्टॅच्यू मॅन’ राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’; वयाच्या 100व्या वर्षी राज्याचा सर्वोच्च सन्मान
दिशाभूल करू नका खोट्याचा नायटा कराल तर बूमरँग होईल! उद्धव ठाकरे यांचा इशारा
हिंमत असेल तर संजय राठोड, जयकुमार गोरे, सोमय्याबद्दल तोंड उघडा, शिवसेनेचा सरकारवर हल्ला… सभागृह तीनदा ठप्प
विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती पक्षपाती, महाविकास आघाडीची राज्यपालांकडे तक्रार
कर्मयोगी बाबा! आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण – अनिल राम सुतार
औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून पत्र्यांवर तारेचे कुंपण