कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी मुख्य अभियंत्याकडून दिशाभूल! शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांचे विभागीय आयुक्तांना निवेदन

कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी मुख्य अभियंत्याकडून दिशाभूल! शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांचे विभागीय आयुक्तांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदार कंपनीला पाठीशी घालण्यासाठी मर्जीतील नवीन पीएमसीची नियुक्ती करण्यात आली. कामामध्ये झालेल्या कंत्राटदाराच्या चुका झाकण्यासाठी मुख्य अभियंता यांच्याकडून वारंवार वरिष्ठांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत केले जात आहे. नवीन मुख्य अभियंता यांची नियुक्ती झाल्यानंतरच योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीला चुकीच्या पद्धतीने पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. योजनेची परिपूर्ण माहिती नसल्याने व जीव्हीपीआरबरोबरच्या पूर्वाश्रमीचा कामाचा अनुभव असल्याने कंत्राटदार कंपनीला मदत करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री व मंत्री आणि उच्च न्यायालय यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे का? अशी शंका येते. यामध्ये जीव्हीपीआर कंपनीला विना दंड मुदतवाढ व भाववाढीतील फरक मिळावा, हा उद्देश तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.

शहरातील जलवाहिनीची कामे करताना रस्त्यांची झालेली दुरावस्था याकडे दुर्लक्ष केले जात असून रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. वास्तविक निविदेमध्ये रस्त्यांच्या पुनर्बाधणीसाठी वेगळी तरतूद केलेली आहे. तसेच जॅकवेलचे काम देखील योग्य पद्धतीने होत नसल्याचे कळते. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. तरी देखील जीव्हीपीआर कंपनीला अद्यापपर्यंत कुठलाही दंड संबंधित खात्याकडून ठोठावण्यात आलेला नाही. मुख्य अभियंत्यांनी या कामावर देखरेख करत असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन समितीला (पीएमसी) योजनेच्या सुरुवातीपासूनची तंतोतंत माहिती होती. तिला काढून आपल्या मर्जीतील ‘चॉईस’ नावाच्या प्रकल्प व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. कारण संबंधित पीएमसीचे कुठलेही कर्मचारी, अधिकारी निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना देखरेख करताना दिसून येत नाहीत. ही योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा व योजना पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी 5 वर्षे योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च लागू नये, याच उद्देशाने हे पत्र देत असल्याचे राजू वैद्य यांनी नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात धाव तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात धाव
पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग यी यांनी मुंबई...
जोरदार युक्तिवाद, उलटतपासणी अन् बुद्धिकौशल्याचे कसब! डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात पार पडली द्वितीय नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा
ज्वेलर्सचे दुकान फोडणारे अटकेत
माथाडी कामगार विधेयक विधान परिषदेत संमत
इस्रायलचे गाझात रात्रभर हल्ले; 85 पॅलेस्टिनींचा मृत्यू
हिंदुस्थानी संशोधकाला अटक
11 कोटीचे कोकेन जप्त