औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून पत्र्यांवर तारेचे कुंपण

औरंगजेबाच्या संरक्षणासाठी मोदी सरकार धावले! कबरीच्या सभोवती पत्रे ठोकले; कुणी उडी मारू नये म्हणून पत्र्यांवर तारेचे कुंपण

हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचणारा, छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा, हिंदूंवर जिझिया कर लावणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या संरक्षणासाठी केंद्रातील मोदी सरकार धावले आहे. रत्नपूर येथील औरंगजेबाच्या थडग्याला त्रिस्तरीय संरक्षण देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. औरंगजेबाच्या थडग्याभोवती 12 फूट उंचीचे पत्रे ठोकण्यात आले असून, कुणी उडी मारू नये म्हणून त्यावर काटेरी तार लावण्यात येणार आहे.

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब चांगला प्रशासक असल्याचा जावईशोध लावला होता. त्यावरून फडणवीस सरकारने आझमी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील संघटनांनी कारसेवा करून औरंगजेबाचे थडगे उखडण्याचा इशारा दिला. त्यासाठी 17 मार्च रोजी या संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनही केले. परंतु, हे आंदोलन सर्वसामान्य जनतेने लाथाडल्यामुळे औरंगजेब हा सध्या संयुक्तिक विषय नसल्याची जाहीर भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घ्यावी लागली.

सगळा मामला केंद्राच्या अखत्यारीत

औरंगजेबाची कबर राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या यादीत असून, त्याची अखत्यारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पर्यायाने केंद्र सरकारकडे आहे. भविष्यातील धोका लक्षात घेऊन पुरातत्त्व खात्याने कबरीला त्रिस्तरीय संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. कबर ज्या परिसरात आहे त्या जैनुद्दीन शिराजी दर्ग्याच्या परिसराला राज्य राखीव पोलीस दलाने वेढा घातला आहे. जैनुद्दीन शिराजी यांच्या मजारकडील पाठीमागील संगमरवरी संरक्षण भिंतीच्या शेजारीच 12 फूट उंचीचे पत्रे ठोकण्यात आले असून, त्यावर लोखंडी अँगल लावून त्याला काटेरी तार लावण्यात येणार आहे. औरंगजेबाच्या कबरीकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ते रेड्याचं पण दूध…, कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा डिवचले ते रेड्याचं पण दूध…, कुणाल कामरा प्रकरणावरून संजय राऊतांनी पुन्हा डिवचले
औरंगजेबाची कबर, दिशा सालियान आणि कुणाल कामरा या भोवतीच राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसात फिरत आहे. या मुद्यांचे राजकीय भांडवल...
‘लॉर्ड’ शार्दुल, नाव लक्षात ठेवा! हैदराबादला ‘वेसण’ घातल्यानंतर सोशल मीडियावर ठाकूरचीच हवा
अ‍ॅमेझॉनच्या गोदामात सापडली नकली उत्पादने
आयटीआर-यूसाठी 31 मार्चपर्यंत डेडलाइन
…तर तालिबानी पद्धतीप्रमाणे गद्दारांना 100 फटके अन् फाशी, कुणाल कामराला ‘थर्ड डिग्री’ देण्याची भाषा करणाऱ्यांना संजय राऊत यांनी फटकावलं
अमरनाथ यात्रेसाठी 14 एप्रिलपासून नोंदणी सुरू
आरबीआयने दोन बँकांना ठोठावला दीड कोटींचा दंड