नियोजनाच्या अभावामुळे महाकुंभ ‘मृत्यूकुंभ’ बनला! ममता बॅनर्जी यांचा योगी सरकारवर हल्लाबोल

नियोजनाच्या अभावामुळे महाकुंभ ‘मृत्यूकुंभ’ बनला! ममता बॅनर्जी यांचा योगी सरकारवर हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत्यू आणि गर्दीचं गैरव्यवस्थापन यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच या अव्यस्थापनामुळे महाकुंभ आता ‘मृत्यू कुंभ’ बनला आहे असा हल्लाबोल केला. व्हीआयपींना विशेष सुविधा दिल्या जात असताना, गरिबांना आवश्यक सुविधांपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.

त्यांनी भाजप सरकारवर टीका केली, ते ‘राष्ट्राचे विभाजन करण्यासाठी धर्माचा वापर करत आहेत’ असा आरोप त्यांनी केला. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभत नियोजनाचा अभाव दिसत आहे, असं त्या म्हणाला.

‘हा ‘मृत्यू कुंभ’ आहे. मी महाकुंभाचा आदर करते आणि मी पवित्र गंगा मातेचा आदर करते. पण प्रयागराजमध्ये कोणतंही नियोजन नाही. किती लोकांना वाचवले गेले आहे? श्रीमंत आणि व्हीआयपींसाठी, १ लाख रुपयांपर्यंत छावण्या (तंबू) मिळवण्यासाठी व्यवस्था आहे. पण गरिबांसाठी, कुंभमेळ्यात कोणतीही व्यवस्था नाही’, असं पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करताना त्या म्हणाल्या.

कुंभमेळ्या सारख्या आयोजनांसाठी योग्य व्यवस्थेची गरज असते असं म्हणतानाच त्यांनी प्रश्न केला की, ‘इतक्या मोठ्या मेळ्यासाठी योग्य नियोजन असायला हवं होतं. घटनेनंतर कुंभमेळ्याला किती आयोग पाठवले गेले आहेत?’

बॅनर्जी यांनी पुढे आरोप केला की मृतदेह शवविच्छेदन न करता बंगालला पाठवण्यात आले. ‘तुम्ही मृत्यू प्रमाणपत्रांशिवाय मृतदेह पाठवल्यामुळे आम्ही इथे शवविच्छेदन केले. या लोकांना भरपाई कशी मिळेल?’, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून...
लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा, काय म्हणाल्या ?
चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत
मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल
जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज
100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं उद्घाटन