Hit & Run – नंदुरबारमध्ये भरधाव कारची मायलेकाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Hit & Run – नंदुरबारमध्ये भरधाव कारची मायलेकाला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

नंदुरबारमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव स्कॉर्पियो कारने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या मायलेकाला जोरदार धडक दिली. या धडकेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पना गजानन वाघ आणि आकाश गजानन वाघ अशी मयत मायलेकांची नावे आहेत. दोघे सोमवारी रात्री 10 च्या सुमारास डोंगरगाव रस्त्यावरून पायी घरी चालले होते. यादरम्यान, भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पियो कारने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

या मार्गावर गतिरोधक नसल्याने येथे अपघाताच्या घटना नेहमी घडत असतात. याबाबत स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याबाबत बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच मायलेकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक टीम इंडियाने बांगलादेशला लोळवलं, 6 गडी राखून केला पराभव; शुभमन गिलने झळकावलं शतक
टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात विजयानं केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 गडी राखून...
लाडक्या बहि‍णींना भेटून आदिती तटकरे यांची महत्वाची घोषणा, काय म्हणाल्या ?
चार वर्षांच्या ब्रेकनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचं टीव्हीवर कमबॅक; आता मध्येच सोडला शो
Apple चा सर्वात स्वस्त iPhone लॉन्च, मिळणार जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स; जाणून घ्या किंमत
मुंबईतल्या गोरेगावमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल
जालन्यातील खरपुडी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश, अंबादास दानवेंनी उठवला होता आवाज
100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्य महोत्सवाची दमदार सुरुवात, सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं उद्घाटन