Rishabh Pant रिषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

Rishabh Pant रिषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

टीम इंडियाचा गोलकिपर व फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात झाला तेव्हा त्याला गाडीतून बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात नेणाऱ्या तरुणाने त्याच्या प्रेयसीसोबत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रजत कुमार असे त्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे तर रजतची प्रकृती गंभीर आहे.

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात राहणाऱ्या रजतचे मनू कश्यप या 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघ वेगळ्या जातीचे असल्याने त्यांच्या नात्याला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. घरचे त्या दोघांचे लग्न त्यांच्या जातीत ठरवत होते. त्यामुळे दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केली. मात्र यात तरुणीचा मृत्यू झाला तर रजतवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डिसेंबर 2022 ला रिषभ पंत दिल्लीवरून उत्तराखंडला जात असताना रुरकी येथे त्याच्या मर्सिडिजचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला. त्यावेळी रजत व त्याचा सहकारी निशू कुमार यांनी त्याला जळत्या कारमधून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. रिषभ पंत बरा झाल्यानंतर त्याने या दोघांनाही बाईक भेट केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन