मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट, मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारचे पाऊल
मणिपूर राज्यात केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी करून राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरी व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल अशी शक्यता होती. दरम्यान केंद्र सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेतला आहे.
President’s Rule imposed in Manipur.
Manipur CM N Biren Singh resigned from his post on 9th February. https://t.co/vGEOV0XIrt pic.twitter.com/S9wymA13ki
— ANI (@ANI) February 13, 2025
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा
9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांची राजभवनात आज बैठक पार पडली. यावेळी राज्यात सैन्य कुठे तैनात करण्यात आले आहे याची माहिती दिली गेली.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List