अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यावरही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार;तज्ज्ञांचे मत

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यावरही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार;तज्ज्ञांचे मत

अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स 8 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत. त्यांची सुकलेली त्वचा आणि कमकुवत शरीर पाहून डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली आहे. आता 12 फेब्रुवारीला सुनीताच्या परतण्याचा प्लॅन निश्चित झाला आहे. 12 मार्च रोजी त्यांना पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. अवकाशात तब्बल 280 दिवस घालवल्यानंतर सुनीता यांच्या आयुष्यात अनेक बदल होणार असून त्यांना सावरण्यास बराच काळ लागू शकतो. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबतही डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

पृथ्वीचे वातावरण पृथ्वीपासून आकाशाच्या दिशेने 100 किमी अंतरावर आहे. अंतराळ स्थानकापासून पृथ्वीवर येताना सुनीता आणि बुच यांचे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल, ज्याला ‘रिएंट्री’ म्हणतात. ही प्रक्रिया सर्वात धोकादायक आणि घातक ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, सुनीता पृथ्वीवर परतल्यानंतरही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी वर्तवली आहे.

पृथ्वीवर चालणे, धावणे, उठणे आणि बसणे हे आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्नायूंचा वापर आणि हालचाल होते. पृथ्वीवर आपले स्नायू नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध कार्य करतात. मात्र, अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने काम करण्यासाठी स्नायूंवर जास्त ताण येत नाही. गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळवीर तेथे तरंगत असतात. दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने स्नायू कमकुवत होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाडांची घनता दरमहा 1 टक्के कमी होते. याचा विशेषतः पाय, पाठ आणि मान यांच्या स्नायूंवर परिणाम होतो. यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालण्यात अडचण येते.

पृथ्वीवर परतल्यानंतर, अंतराळवीरासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सामान्य जीवनात परतणे हे सर्वात मोठे आव्हान असते. कोणत्याही अंतराळवीराला सामान्य होण्यासाठी साधारणपणे 45 दिवस ते काही महिने किंवा कधी कधी एक वर्षही लागते. ते अंतराळात किती काळ असतात, त्यावर हे अवलंबून असते. अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरात अनेक बदल होतात. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने आपल्याला पायांची गरज नाही असे वाटू लागते. अशा परिस्थितीत पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेणे आणि परत सामान्य जीवनात परतणे आव्हान असते. यासाठी डॉक्टर आणि शारीरिक तज्ज्ञांकडून रिकव्हरी ट्रेनिंग घ्यावी लागते. स्नायू आणि हाडे सावरण्यासाठी अनेक महिने व्यायाम करावा लागतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले. सुनीता या तब्बल 8 महिने अंतराळात असल्याने पृथ्वीवर परतल्यानंतरही त्यांना अनेक अडचणींचा सामना कारवा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन