शहरातील सर्व भंगार दुकानांवर कारवाई करणार, पालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा

शहरातील सर्व भंगार दुकानांवर कारवाई करणार, पालिका आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली, कुदळवाडीतील पाच हजारांवर भंगार दुकाने आणि गोदामांवर ज्याप्रकारे सरसकट अतिक्रमण हटाव कारवाई केली, त्याच प्रकारे शहरातील काळेवाडी, पिंपरी, वाल्हेकरवाडी, सांगवी आदी भागातील भंगार व्यावसायिकांवरही शंभर टक्के कारवाई करण्यात येणार आहे. शहरात एकालाही भंगार व्यवसाय करू दिला जाणार नसल्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात व अधिकारी उपस्थित होते. आयुक्त सिंह म्हणाले की, ‘तळवडेतील कारखान्यात तसेच कृष्णानगर येथील एका हार्डवेअरच्या दुकानात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. त्या आगीच्या घटनेनंतर महापालिकेने शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण केले. त्यात कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार आयुक्त, महापालिका तसेच अग्निशमन विभागाचे कोणतेही परवाने नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडतात.

तसेच वायू व जलप्रदूषण होत आहे. महापालिका व एमआयडीसी माणुसकीच्या नात्यातून तेथे पाणीपुरवठा करीत आहे. अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर महापालिका काहीच कारवाई करत नाही, अशी टीका वेळोवेळी आमच्यावर सातत्याने होत होती. त्यामुळे कुदळवाडीत कारवाई केली. त्यात कोणताही राजकीय दबाव नाही. त्या कारवाईनंतर शहरातील सर्व भंगार व्यावसायिकांवर कारवाई होणार आहे. काळेवाडी, पिंपरी, वाल्हेकरवाडी, सांगवी यांसह सर्व ठिकाणी भंगार दुकाने व गोदामावर 100 टक्के कारवाई केली जाईल. शहरात एकही भंगार व्यावसायिक ठेवला जाणार नाही.

निळ्या पूररेषेतील बांधकामांवरही करणार कारवाई

पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामेही पाडण्यात येणार आहेत. नव्याने झालेली बांधकामे आणि व्यापारी बांधकामे व पत्राशेडवर प्रथम कारवाई करण्याचे महापालिकेने नियोजन केले असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

शहरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार

बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर दहावीच्या बोर्ड परीक्षा होणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने मनपा हद्दीतील परीक्षा केंद्रांवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सहायक आयुक्त, माध्यमिक शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. भरारी पथकांमार्फत मनपा हद्दीतील संवेदनशील व असंवेदनशील परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देऊन काही गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन