नक्षलवाद्यांनी भाजप सरपंचपदाच्या उमेद्वाराची घरात घुसून केली हत्या, पत्नी समोरच संपवले

नक्षलवाद्यांनी भाजप सरपंचपदाच्या उमेद्वाराची घरात घुसून केली हत्या, पत्नी समोरच संपवले

नक्षलवाद्यांनी क्रुरतेची हद्दच पार केली आहे. किरंदुल अरणपूर येथील भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार जोगा राम यांची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली आहे. अरणपूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शेकडोंच्या संख्येने आलेल्या नक्षलवाद्यांनी ही हत्या केली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आधी संपूर्ण गावाला घेराव घातला आणि नंतर सर्वांच्या घरातील लाईट बंद केल्या. त्यानंतर सरपंच जोगा यांच्या घरी पोहोचले, मात्र जोगा यांच्या पत्नीने दार उघडले नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडून घरात घुसले आणि पत्नीसमोरच पतीची हत्या केली. जोगाच्या मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केले होते. त्यावेळी 6 नक्षलवादी त्यांच्या घरात घुसले होते. त्यावेळी सरपंचाची पत्नी लक्ष्मीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण दोन नक्षलवाद्यांनी तिला बंदी बनवले होते. तर इतर 4 नक्षलवाद्यांनी जोगा यांची निर्घृण हत्या केली. जोगा गेल्या 25 वर्षांपासून अरणपूर पंचायतीचे सरपंच होते. अरणपूर पंचायतीत जेव्हा जेव्हा महिलांची जागा असायची तेव्हा त्यांची पत्नी निवडणूक लढवायची आणि जेव्हा ती जागा मोकळी व्हायची तेव्हा जोगा निवडणूक लढवायचे.

नक्षलवादी भेदरले असून  ते निष्पाप लोकांना मारत आहेत. बाहेरील नक्षलवादी या भागात आलेले नाहीत. हे स्थानिक नक्षलवाद्यांचे काम आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच नक्षलवाद्यांना पकडले जाईल असे दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक गौरव रॉय यांनी सांगितले.

 

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी...
ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड
भारतात स्त्री सुरक्षा वाऱ्यावर? भूमी पेडणकर म्हणते, ‘भारतात महिला म्हणून वावरायला भीती वाटते…’
प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..