एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावे, संजय राऊत यांचं आव्हान

एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावे, संजय राऊत यांचं आव्हान

”एकनाथ शिंदे हे घाबरलेले, लाचार व्यक्ती आहेत. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार तरी निवडून आणणून दाखवावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

एकनाथ शिंदे यांना अमित शहांना लोहपुरुषाची उपमा दिली. त्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ”एकनाथ शिंदे हे घाबरलेले व्यक्ती आहेत. लोहपुरुष जर अमित शहा आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? हे एकनाथ शिंदे घाबरलेले, लाचार आहेत. खरी शिवसेना कोण व खोटी कोण हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा सर्वांना कळेल. आज दहशत, दबाव, पैशांची ताकद, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन तुम्ही सर्व करत आहात. एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमादार निवडून आणून दाखवावे. जे चिन्ह चोरलंय ते परत करावं व नवीन चिन्ह घेऊन लढवून दाखवावं. बाळासाहेबांच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या करता आणि आम्हाला अमित शहांची दादागिरी दाखवता. अमित शहा काही अमृत पिऊन आलेले नाहीत. कधी ना कधी जायचंच आहे प्रत्येकाला. तेव्हा जनता फैसला करेल, असा जोरदार घणाघात संजय राऊत यांनी केला.

माणिकराव कोकाटेंबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय राठोड यांचा तत्काळ राजीनामा घेतला होता. राजीनामा का घेतला हे देवेंद्र फडणवीसांना माहित आहे. भाजपने ती मागणी केली होती. ज्यांच्यावर तुम्ही खून बलात्काराचे आरोप केले आता तेच तुमच्या मांडिवर बसलेले आहेत. कोर्टाने ज्यांना शिक्षा सुनावली आहे, भ्रष्टाचारी ठरवले आहे. त्यांच्या बाबतीत फडणवीस गप्प का? भाजप नैतिकतेच्या गोष्टी करत असते पण नैतिकता त्यांच्या आसपासही फिरकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”सीमावासियांसाठीच्या लढ्यात जे जेलमध्ये गेले त्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेही नाही. जस भाजपचं नाव स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नाही. तसंच एकनाथ शिंदे यांचं नाव देखील सीमा लढ्यात नाही. कोणत्याही संघर्षात त्यांचं नाव नाही. सीमाभागाचा कार्यभार असताना, मुख्यमंत्री असताना देखील ते सीमाभागात कधी गेले नाही. कारण त्यांना अटकेची भिती होती, असे संजय राऊत म्हणाले.

सीमाप्रश्नावर बोलताना पुढे ते म्हणाले की, ”देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यायला हवी. सीमाभागाचा विषय न्यायप्रविष्ठ आहे असे असतानाही कर्नाटक सरकार जे करतेय ते चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांशी बोलायला हवे”.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा.. मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा..
दिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव...
नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुंडलीच मांडली, मागितला 18 मर्सिडीजचा हिशोब
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक काय?
‘बाबू काबूच्या बाहेर असतो, महिन्यातून किमान 20 वेळा तरी…’ ; प्रसिद्ध अभिनेत्रीनेच कास्टिंग काऊचबाबत सगळं सांगितलं
बच्चन कुटुंब आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये 30 वर्षांपासून कट्टर शत्रूत्व; एकत्र काम न करण्याची घेतली शपथ
‘हा’ एक बदल केला असता तर ‘छावा’मधली ती भूमिका आणखी खुलली असती; तुम्हाला काय वाटतं?
महाकुंभमध्ये डुबकी मारल्यानंतर पवन कल्याण रुग्णालयात दाखल; नदीतील प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित