तुम्हाला तुमची उद्दीष्ट साध्य करायची आहेत का? मग आजपासून ‘या’ गोष्टींची सवय लावून घ्या..
हृदयात दडलेली कोणतीही व्यथा सांगता येत नसेल तेव्हा आपण ती पानावर उतरवतो. लिखाणामुळे मनाची वेदना बर्याच अंशी कमी होते. म्हणूनच आजही अनेकांना डायरी लिहायला आवडते. डायरी लिहिणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जाणून घेऊया डायरी लिहिण्याचे काय होतात फायदे
व्यक्त होण्याचं उत्तम माध्यम- डायरी लिहीणं म्हणजे व्यक्त होण्याचं एक उत्तम माध्यम आहे. मनात सलत असलेली एखादी गोष्ट व्यक्त कुणाकडे करायची अशावेळी डायरी हा एक उत्तम पर्याय आहे. डायरी लिहील्यामुळे मन मोकळे होण्यास मदत होते.
एकटेपणा कमी होण्यासाठी- आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळ कमी असतो. अशा वेळी तुमचे ऐकणारे किंवा वेळ देणारे कोणी तुमच्याकडे नसेल, तर डायरी लिहिण्याची सवय लावल्याने तुमचा एकटेपणा बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.
गोष्टी लक्षात राहण्यासाठी- प्रोफेशनल लाइफ असो की पर्सनल लाईफ, बऱ्याचदा अनेक गोष्टी आपण विसरतो. यामध्ये वाढदिवस, लग्नसमारंभ इ. अनेक कार्यक्रम लिहीण्यासाठी डायरी हा चांगला मार्ग आहे. तुम्ही प्रत्येक लहान-मोठी गोष्ट डायरीत लिहाल तेव्हा गोष्टी लक्षात राहतील. गोष्टी विसरल्या तरी डायरी पुन्हा वाचल्याने तुमची आठवण ताजी होईल.
फोकस वाढेल- तुम्ही तुमची उद्दिष्टे डायरीत लिहिली, तर तुम्ही डायरी वाचाल तेव्हा तुमची उद्दीष्टे समोर दिसतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List