एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम परीक्षा संपल्यानंतर सुरू करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम परीक्षा संपल्यानंतर सुरू करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुना झालेला एलफिन्स्टन पूल तोडला जाणार आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर हे तोडकाम केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर तोडकाम सुरू करावे, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख- आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेला वरळी-शिवडी कनेक्टर हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे, परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. एलफिन्स्टन पूल पाडणे हा या प्रकल्पाचाच भाग आहे. एलफिन्स्टन पुलाचे तोडकाम फेब्रुवारीत सुरू करण्याची सरकारची योजना आहे; परंतु पूल पाडल्यानंतर त्या भागात वाहतुकीची कोंडी होऊन विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तोडकाम परीक्षा संपल्यानंतर करण्यात यावे, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे. वरळी-शिवडी कनेक्टरचे प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना, उड्डाणानंतर 30 सेकंदातच कोसळले, अनेक घरांना आग; सहा जणांचा मृत्यू अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना, उड्डाणानंतर 30 सेकंदातच कोसळले, अनेक घरांना आग; सहा जणांचा मृत्यू
अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना घडली आहे. फिलाल्डेफिया येथील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 30 सेकंदातच एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. शॉपिंग मॉलजवळ हे...
मोदीsss मोदीऽऽऽ मोदीsss मोदीsss मोदीsss..विकास हरवला… जीडीपी रोडावला; आर्थिक पाहणी अहवालातील चित्र चिंताजनक
नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून सरकारने मृतांचे आकडे लपवले
जैन मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनाही नुकसानभरपाई द्या! ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनची मागणी  
महाकुंभमेळ्यात त्याच रात्री आणखी एक चेंगराचेंगरी, योगी आणि मोदी सरकारची लपवाछपवी; 1500 हून अधिक भाविक बेपत्ता
मराठी माणसाला कलह करायला आवडतो, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात देवाभाऊंनी दिला आठव्या शतकातील दाखला
माशाच्या ‘चन्ना एम्फिबियस’ प्रजातीचा 92 वर्षांनी पुनर्शोध, ठाकरेवाइल्डलाइफ फाऊंडेशनची ‘चमकदार’ कामगिरी