धर्म नाही, तर मुलांचे कल्याण महत्त्वाचे आहे; वडिलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

धर्म नाही, तर मुलांचे कल्याण महत्त्वाचे आहे; वडिलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

तीन वर्षाच्या मुलीला पत्नीने जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करत हायकोर्टात धाव घेणाया मुस्लिम पित्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. धर्म हा घटक महत्त्वाचा नाही तर मुलांचे कल्याण महत्त्वाचे आहे असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने पित्याची याचिका फेटाळून लावली.

3 वर्षांच्या मुलीचा पत्नी दिल्ली येथे पळवून घेऊन गेल्याचा दावा करत पित्याने मुंबई उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली होती. मुलीचा ताबा त्याच्याकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर आज सोमवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्याने इस्लामिक कायद्यानुसार, वडील हे मुलाचे नैसर्गिक पालक असल्याचा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे कान उपटले व नमूद केले की, अशा प्रकरणांमध्ये मुलाच्या कल्याणाचा विचार करण्यासाठी न्यायालयासमोर धर्म हा एकमेव विचार येत नाही. कारण तो निर्णायक घटक नाही. तर अल्पवयीन मुलाच्या कल्याणासाठी काय महत्त्वाचे आहे हे न्यायालयाला विचारात घ्यावे लागते त्यानुसार आमच्या मते तीन वर्षाच्या मुलीच्या कल्याणासाठी ती तिच्या आईच्या ताब्यात असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने पित्याची याचिका फेटाळून लावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा...
आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…
‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर