सहा जिल्ह्यांत शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय रद्द, फडणवीसांनी शिंदेंचा आणखी एक निर्णय फिरवला

सहा जिल्ह्यांत शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय रद्द, फडणवीसांनी शिंदेंचा आणखी एक निर्णय फिरवला

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय धडाधड रदद् करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाका लावला आहे. राज्यातल्या शेतकऱयांसाठी शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात घेतला होता. पण गडचिरोली, बीड, जालना, कोल्हापूर, नांदेड अमरावती या सहा जिल्ह्यातील शेतकरी भवन बांधण्यास दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील चार महिन्यात घेतले आहे. त्यामध्ये आता शेतकरी भवनाची भर पडली आहे.

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणाऱया शेतकऱयांना जेवण व मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. . यासाठी शेतकरी भवन नसलेल्या 116 बाजार समित्यांना प्रत्येकी 1 कोटी 52 लाख खर्च करण्यात येणार होते. यासाठी पणन विभाग 50 ते 70 टक्के निधी देण्याचा निर्णय झाला होता. पण राज्याच्या सहकार, पणन विभागाने आदेश जारी करून शेककरी भवनाची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे.

असे होते शेतकरी भवन

शेतकरी भवनाचे मॉडेलही निश्चित करण्यात आले होते. यात तळ मजल्यावर बहुउउदेशीय हॉल, तीन शॉप, पहिल्या मजल्यावर चार रूम, एकूण 20 बेडची ही इमारत असणार आहे. प्रत्येक शेतकरी भवनासाठी 1.52 कोटी रुपये खर्च अपेक्षित असला तरी त्यापैकी 30 ते 50 टक्के खर्च बाजार समितीला आणि उर्वरित निधी राज्य सरकार अशी योजना होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा...
आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…
‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर