एल्फिन्स्टनच्या 19 इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार

एल्फिन्स्टनच्या 19 इमारतींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातल्या 19 इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून या इमारतींमधील रहिवाशांचे याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्य केली.

एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीए, मुंबई महापालिका तसेच एमएसआरडीएचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या परिसरातील सर्व 19 इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही विकासकाची वाट न पाहता विकास नियंत्रण नियमावली 33(9) अंतर्गत एमएमआरडीने करावा, अशी सूचना बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती सूचना मान्य केली.

सरकारच्या नव्या नियोजनानुसार फक्त दोन चाळी बाधित होणार आहेत. मात्र, एकूण 19 इमारतींना धोका निर्माण होईल, अशी रहिवाशांची भीती आहे. त्यामुळे सर्व 19 इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय झाल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. ज्या दोन चाळी पाडाव्या लागणार आहेत त्या दोन्ही चाळींतील रहिवाशांना कुर्ला येथे संक्रमण शिबीरात पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, त्याला रहिवाशांचा विरोध आहे.

अधिक एफएसआय मिळणार?

विकास नियंत्रण नियमावली 33(9) ही मुंबई महापालिका क्षेत्रात समुह पुनर्विकासासाठी(क्लस्टर डेव्हलमेंट) वापरली जाते. या नियमाअंतर्गत अनेक जीर्ण किंवा मोडकळीस आलेल्या इमारती एकत्र करून मोठा भूखंड तयार केला जातो. त्यावर एकत्रित पुनर्विकास योजना राबवता येते. त्यामुळे अधिक एफएसआय मिळवता येतो असे नगरविकास विभागातील एका अधिकाऱ्यांना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा...
आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…
‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर