घोटभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींची कोसभर पायपीट, माणगावच्या पन्हळघरमध्ये टंचाईचे चटके

घोटभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींची कोसभर पायपीट, माणगावच्या पन्हळघरमध्ये टंचाईचे चटके

निवडणुका जिंकण्यासाठी भाजप व मिंध्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि मते मिळवली. त्या जोरावर सरकारदेखील स्थापन केले. पण ज्या बहिणींनी मते दिली त्याच लाडक्या बहिणींना घोटभर पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत आहे. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील पन्हळघर या आदिवासी वाडीमध्ये सर्वत्र हेच चित्र सध्या दिसत आहे. डोईवर हंडा घेऊन माता-भगिनींना पाण्यासाठी भरउन्हात वणवण फिरावे लागत असून हेच का लाडक्या बहिणींवरील प्रेम, असा सवाल विचारण्यात येत आहे.

पन्हळघर ही डोंगराच्या कुशीत वसलेली आदिवासी वाडी असून उन्हाळा आला की येथील ग्रामस्थांच्या अंगावर काटा येतो. पाण्याकरिता आपले सर्वस्व पणाला लावावे लागते. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात खड्डा खणून त्यात साठलेले पाणी भरण्याची वेळ येथील आदिवासींवर आली आहे. पावसाळ्यातील चार महिने संपले की, उरलेले सर्व दिवस पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर दूरवर जावे लागते. पन्हळघरमध्ये दोनशेहून अधिक लोकवस्ती असून लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण फक्त पाण्यासाठी रोज लढत आहेत.

विभागाचे धरण आहे. पण या धरणातील पाण्याचा एक थेंबही वाडीत राहणाऱ्या आदिवासींना मिळालेला नाही.
गावाजवळच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्रज्ञ विद्यापीठ आहे. तेथेदेखील मुबलक प्रमाणात पाणी असून आदिवासी वाडी मात्र तहानलेली आहे. खड्ड्यातील दूषित पाणी प्यायल्यामुळे लहान मुले व वृद्ध यांना पोटाचे विकार जडले असून औषधपाणी करायलादेखील आदिवासींकडे पैसे नाहीत.

केवळ पाच किलोमीटर अंतरावर महामार्ग
माणगाव तालुक्यातील पन्हळघर ही आदिवासी वाडी मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. पण त्यांच्या नशिबी थेंबभर पाण्यासाठी वणवण आली असून हाच का विकास, असा संतप्त सवाल आदिवासींनी केला आहे. सरकारने अनेक पाणी योजना आणल्या. डोंगर, दऱ्यांमध्ये तसेच वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांना मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घोटभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींना कोसभर करावी लागणारी फरफट थांबणार तरी केव्हा, असा आर्त प्रश्न विचारण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा...
आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…
‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर