उष्णता वाढल्याने आठवडे बाजारात शुकशुकाट

उष्णता वाढल्याने आठवडे बाजारात शुकशुकाट

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बुधवारी दुपारी तापमानाचा पारा 40 अंशावर गेल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. महिनाभरापासून दर बुधवारी तीन वाजता सुरू होणारा आठवडे बाजार उन्हाच्या कडाक्यामुळे संध्याकाळी पाचच्या पुढे उशिरा भरत असल्याने व्यापारी, शेतकरी आणि ग्राहक रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारात असतात.

नीरा येथील आठवडे बाजारात परिसरातील खेड्यापाड्यातून नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते. भाजीपाला, शेतीशी निगडित साहित्य, घरगुती वस्तू, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल, कपडे यांसह अन्य गोष्टींची दुकाने, छोटे व्यापारी या आठवडे बाजारात थाटतात. मात्र, यंदा उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम आठवडे बाजारावर होत असून, व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

सायंकाळी ऊन उतरल्यानंतर पाच ते सहा वाजण्याच्या पुढे ग्राहकांची बाजारात प्रचंड गर्दी होते. रात्री सात वाजण्याच्यापुढे दुकान आवरून घरी जाण्याची लगबग सुरू असते. त्यामुळे मिळेल त्या किमतीला भाजीपाला किंवा इतर मालाची विक्री करण्याची वेळ येत असल्याने काही वेळा आर्थिक फटका सहन करावा लागतो, अशी व्यथा छोट्या व्यावसायिकांनी मांडली. दुपारी बारानंतर उन्हाचा चटका वाढत असल्याने ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. अनेक वेळा ग्राहक नसल्याने उन्हात बसून राहण्याची वेळ छोट्या व्यावसायिकांवर येते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा सुनील गावस्कर कृष्ण तर अशोक सराफ बलराम; नाटकाचा भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म मुंबईचा. 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सहा-साडेसहा वर्षांचे असतानाच त्यांनी वाडीतल्या एकांकिकेमध्ये पहिल्यांदा...
आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…
‘लग्न यशस्वी झाले नाही, माझी काय चूक?’, समांथाने घटस्फोटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत, आयटम साँग न करण्याचा दिला होता सल्ला
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींबद्दल इमरान हाश्मीचं वक्तव्य; म्हणाला..
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात चोरी; 34 लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण पसार
ऐकण्याच्या बाबतही महिला वरचढ, संशोधनातून नवी माहिती समोर