महायुतीत खळबळ… भांडय़ाला भांडं लागतंच! चंद्रकांत पाटील बिनधास्तपणे बोलून गेले…

महायुतीत खळबळ… भांडय़ाला भांडं लागतंच! चंद्रकांत पाटील बिनधास्तपणे बोलून गेले…

राज्यात सत्ताधारी महायुतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा असतानाच आज भाजप नेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील बिनधास्तपणे बोलून गेले. ‘एकाच रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात, तिथेही भांडय़ाला भांडं लागतंच! सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पाहावी लागतील की, ती जिवंत आहेत की गेली आहेत,’ असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार केली असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. आणि अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पाहावी लागतील. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत.  खळखळ व्यक्त करायची असते. जर ती व्यक्त केली नाही, तर माणसं आजारी पडतात.’

फडणवीस यांनी अर्थ सल्लागार नेमला; अजितदादांच्या खात्यावर वॉच

राज्यात महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा एकमेकांवर विश्वास आहे की नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे अजितदादांना प्रिय असलेल्या त्यांच्या अर्थ खात्यावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘वॉच’ राहणार आहे. परदेशी यांची नेमणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुचली नसल्याचीदेखील चर्चा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी
एसटीच्या प्रवासादरम्यान एसटी बसेसना ठराविक थांबे दिलेले असतात. या थांब्यातील हॉटेलात अगदी बेचव आणि महागडे जेवण प्रवाशांच्या माथी मारले जात...
यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर
उन्हाळ्यात मधुमेही रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात का? तज्ञ काय सांगतात ?
शाहरुख खानच्या बंगल्यात मुक्काम करण्याची संधी; मिळेल सुपरस्टारसारखा अनुभव, एका दिवसाचे भाडे किती?
40व्या वर्षी सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर….
मधुमेही रूग्ण दूध पिऊ शकतात का? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज – हर्षवर्धन सपकाळ