फडणवीसांच्या आश्वासनाने घात केला! नांदेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विवंचनेतून जीवन संपवलं

फडणवीसांच्या आश्वासनाने घात केला! नांदेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विवंचनेतून जीवन संपवलं

निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते. पण सत्तेत येताच फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांना या वर्षीच नव्हे तर पुढच्या वर्षीही कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यामुळे राज्यातील शेतकरी विवंचनेत सापडले आहे. पैसे भरण्यासाठी बँकांचा तगादा, कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून शेतकरी जीवन संपवत आहेत. नांदेडच्या पाटोदा (थडी) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून जीवन संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिदास विश्वंभर बोंबले (40) या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी येथून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 10 एप्रिल रोजी संताजी अंबेकर यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता 11 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह संताजी अंबेकर यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला लटकल्याचे आढळून आले.

पाटोदा (थडी) येथील मयत शेतकरी हरिदास बोंबले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी येथून 1 लाख 83 हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेले कर्ज व व्याज वसुलीसाठी शेतकरी हरिदास बोंबले यांना बँकेकडून कर्ज भरावे, अन्यथा आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकरी हरिदास बोंबले यांनी दि.10 एप्रिल रोजी संताजी अंबेकर याच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताचे शवविच्छेदन कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. मयत शेतकरी हरिदास बोंबले यांच्यावर पाटोदा (थडी) येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचे चुलतभाऊ माधव किशन बोंबले यांच्या माहितीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद
आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार...
‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर
गर्भवती मृत्यू प्रकरण, दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची ससून करणार चौकशी
सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम
साय-फाय – एक्स विरुद्ध हिंदुस्थान सरकार
वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
वेबसीरिज- वेगळ्या वळणाची तपास कथा