मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? मुंबईतील टँकरचालकांच्या संपावरून आदित्य ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? मुंबईतील टँकरचालकांच्या संपावरून आदित्य ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत ‘पाणीबाणी’ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

48 तासांत पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेनेचे आंदोलन, आदित्य ठाकरे यांचा इशारा

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणी राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतरही राज्य सरकार जागे होतना दिसत नाहीये. आज पुन्हा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

दूषित पाणी, कमी दाबाने येणारं पाणी, अघोषित पाणी कपात अश्या पाण्याच्या अनेक समस्यांनी मुंबईकर गेले काही महिने हैराण आहेत. त्यातच पाणी टॅंकर्सचा संप सुरू झाल्याने मुंबईत अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात महावीर जयंती, आजची हनुमान जयंती, येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे मोठे राष्ट्रीय सण सुरू असताना मुंबईकरांना या समस्येला सामोरं जावं लागतंय. पण वारंवार लक्ष वेधूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? असा प्रश्न पडतोय! पण मुंबईकर म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही! पुढच्या ४८ तासात जर हा प्रश्न सुटला नाही, तर शिवसैनिक आणि मुंबईकर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन जाणार आणि ‘वॉर्ड ऑफिसर’ ना जाब विचारणार!, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

‘फुले’ चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणे ही फडणवीसांची जबाबदारी, संजय राऊत स्पष्टच बोलले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद
आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार...
‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर
गर्भवती मृत्यू प्रकरण, दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची ससून करणार चौकशी
सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम
साय-फाय – एक्स विरुद्ध हिंदुस्थान सरकार
वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
वेबसीरिज- वेगळ्या वळणाची तपास कथा