अनियंत्रित एसयूव्ही कार नदीत कोसळली, अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

अनियंत्रित एसयूव्ही कार नदीत कोसळली, अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

अतिवेगामुळे कार अनियंत्रित होऊन अकलनंदा नदीत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी उत्तराखंडमध्ये घडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. एका महिलेला वाचवण्यास यश आले आहे. टिहरी जिल्ह्यातील देवप्रयाग येथे ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मयत पाचही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळते. अपघातग्रस्त एसयूव्ही कारमधून सहा जण देवप्रयाग येथील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते. यावेळी कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार रस्त्यावर उलटून अलकनंदा नदीत कोसळली.

स्थानिकांनी एसडीआरएफला अपघाताची माहिती दिली. एसडीआरएफने तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील महिलेची सुखरुप सुटका केली. यानंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पाचही मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. क्रेनच्या सहाय्याने कारही बाहेर काढण्यात आली आहे. पोलीस अपघाताबाबत सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद
आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार...
‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर
गर्भवती मृत्यू प्रकरण, दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची ससून करणार चौकशी
सायबरविश्व – साऊंड बॉक्स स्कॅम
साय-फाय – एक्स विरुद्ध हिंदुस्थान सरकार
वेधक – रेडिओ सिलोनचे शतक महोत्सवी वर्ष
वेबसीरिज- वेगळ्या वळणाची तपास कथा