महाकुंभमधून परतल्यानंतर अनेकांना त्वचेचे आजार, फंगल इन्फेक्शन झाल्याची डॉक्टरांची माहिती

महाकुंभमधून परतल्यानंतर अनेकांना त्वचेचे आजार, फंगल इन्फेक्शन झाल्याची डॉक्टरांची माहिती

गंगा आणि यमुना नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे असे अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते. ही बाब आता खरी असल्याचे समोर आली आहे. अनेक भाविक जे महाकुंभ मध्ये पवित्र स्नान करायला आले होते त्यांना अनेक त्वचेचे आजार जडले आहेत. अनेकांना शरीरावर लाल जखमा झाल्या असून अनेकांना त्वचेवर खाज उठली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये त्वचारोग तज्ज्ञांकडे अनेक रुग्णांची रांग लागली आहे. अनेक रुग्णांनी शरीरावर लाल जखम, सतत खाज येण्याची तक्रार केली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे महाकुंभमध्ये पवित्र स्नान करून आले आहेत. अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बराच वेळ ओल्या कपड्या राहणे, अस्वच्छता आणि कुंभमेळ्यात असलेल्या असुविधेमुळे हे आजार झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

57 वर्षीय रणजित कुमार हे महाकुंभमधून परत आल्यानंतर त्यांना अंगभर खाज सुटली होती. हा त्रास सहन न झाल्याने आपण डॉक्टरांकडे उपचारासाठी आल्याचे कुमार यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – सायबर सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार, महिलांना साक्षर करणार; परिपत्रक केले जारी Pune News – सायबर सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार, महिलांना साक्षर करणार; परिपत्रक केले जारी
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकीकडे सर्व गोष्टी आधुनिक आणि झटपट झाल्या आहेत. तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. विशेषकरुन महिलांना...
भाजप आतून बाहेरून दाखवणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शीशमहाल, केजरीवाल यांची अडचण वाढण्याची शक्यता
आसाम निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर, भाजपच्या पराभवासाठी काय आहे रणनीती? वाचा सविस्तर…
झेलेन्स्की रशियाशी चर्चेसाठी तयार, मात्र पुतिन यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट
‘आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो तुमच्यापासून…’; रामदास कदमांचा राऊतांना खोचक टोला
तटरक्षक दलात 300 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
रणवीर अलाहाबादिया मुंबई पोलिसांसमोर हजर, दोन तास चालली चौकशी