तुम्हालाही कोरीयन ग्लास स्किन हवी आहे! मग किचनमधील रोजच्या आहारातील भात आहे खूप महत्त्वाचा

तुम्हालाही कोरीयन ग्लास स्किन हवी आहे! मग किचनमधील रोजच्या आहारातील भात आहे खूप महत्त्वाचा

सध्याच्या घडीला सौंदर्य जगतामध्ये कोरीयन ब्युटी ट्रिटमेंटला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोरीयन ब्युटी ट्रिटमेंट आता हिंदुस्थानातही फार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामध्ये कोरीयनसारखी ग्लास स्किनला मागणी आहे. महिलांसाठी किंवा मुलींसाठी नवीन आलेला ट्रेंड फाॅलो करण्याचा कल कायम असतो. असाच हा सध्याच्या घडीला कोरीयन ब्युटी ट्रेंड फाॅलो करण्याकडे महिलांचे लक्ष वेधलेले आहे.

कोरीयन ब्युटी ट्रेंडमधील काही गोष्टी आणि टिप्स या एकदम आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. या छोट्या टिप्स आपण घरी करुन पाहिल्या तरीही आपणही कोरीयन ग्लास स्किन घरबसल्या मिळवु शकतो. काहीही खर्च न करता केलेले उपाय हे कायमच महिला वर्गाच्या प्रथम पसंतीचे असतात. असेच घरगुती उपाय आपण बघुया. आपल्या आहारामध्ये रोज आपण भाताचा समावेश हमखास करतो. घरी रोज भात होत असल्याकारणाने, आता कोरीयन्स सारखी सुंदर त्वचा तुम्हीही अगदी घरबसल्या मिळवु शकता.

आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला आवश्यक असणारी खनिजे, व्हिटॅमिन पुरवण्याचे काम हे भाताच्या मास्कमधून होत असते. भातामध्ये असलेली पोषक द्रव्ये ही खासकरुन चेहऱ्यावरील त्वचेसाठी पूरक आहेत. 

 

चेहऱ्यावर भाताचा मास्क लावल्यामुळे, मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील जळजळही थांबते.

 

भाताच्या मास्कमुळे चेहरा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळेच त्वचा नाजूक आणि कोमल होण्यास मदत होते.

 

भाताची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे, त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत होते.

 

भाताची पेस्ट चेहऱ्यासाठी थंडावा देण्याचा महत्त्वाचे कार्य करते. 

 

हा मास्क चेहऱ्यावर लावल्यामुळे सुरकुत्या येण्याचा संभव कमी होतो. तसेच त्वचेला येणारा लालसरपणा देखील कमी होतो.

 

भाताचा मास्क चेहऱ्यावर कसा लावाल?

साहित्य

अर्धा कप- शिजवलेला भात

दोन टी स्पून- दूध किंवा दही

छोटा चमचा- मध

बदाम तेल- ३ ते ४ चमचे

कृती

तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यावा. त्यानंतर तो तांदूळ तसाच फ्रीजमध्ये ठेवावा. किमान दोन ते तीन दिवसानंतर, नेहमी आपण भात करतो त्याप्रमाणे भात करावा. 

 

हा भात करताना यामध्ये पाणी जास्त मात्रेमध्ये घालावे. म्हणजे हा भात अधिक शिजवून घ्यावा. 

 

भात पूर्णपणे थंड झाल्यावर, त्याची गरगरीत पेस्ट बनवा. त्यानंतर यामध्ये दूथ किंवा दही तुमच्या आवडीनुसार मिक्स करा.

 

त्यानंतर मध आणि बदाम तेल घालावे. 

 

सर्व मिश्रण नीट एकजीव करावे. या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावर नीट लावावा. 

 

किमान पंधरा ते वीस मिनिटांनंतर, हा मास्क कोमट पाण्यानेच धुवावा. 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा...
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग
मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?