महाशिवरात्रीच्या तोंडावर रताळ्याच्या भावात घसरण; महाशिवरात्रीमुळे रताळी काढणीला वेग;

महाशिवरात्रीच्या तोंडावर रताळ्याच्या भावात घसरण; महाशिवरात्रीमुळे रताळी काढणीला वेग;

जालन्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेऊन गेल्या तीन ते चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रताळ्याची लागवड केली जात आहे. लोणगाव येथील प्रत्येक शेतकऱ्यांने 1 ते 4 एकरापर्यंत, तर अल्पभूधारक शेतकऱ्याने किमान 10 गुंठ्यांत रताळ्याची शेती करीत आहे.

लाेणगावात 200 हेक्टर जमीनीवर रताळ्याची लागवड करण्यात आली असून, लाेणगावला रताळ्याचे माहेर घर म्हणून ओळखले जात आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण तोंडावर आला असल्यामुळे रताळी काढणीला वेग आला आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा रताळ्याच्या भावात घसरण झाली आहे. एक हजार ते 1200 रूपये दराप्रमाणे व्यापारी खरेदी करीत आहे. या वर्षी उत्पादनात निम्याने घट झालेली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे.

लोणगाव येथील शेतकऱ्यांचा रताळ्याची शेती करण्यावर अधिक भर आहे. आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला फराळ म्हणून मोठी मागणी असते. शेतकऱ्यांनी महाशिवरात्री जवळ आल्यामुळे जमिनीतून रताळ्यांची काढणी सुरू केली आहे. ही रताळी महाशिवरात्रीला बाजारात विक्रीसाठी नेली जाते. त्यातून लाखोंची उलाढाल होते. गतवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रताळे लागवडीवर अधिक भर दिला होता.

लोणगाव येथील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात रताळ्याची लागवड केली होती. जालना जिल्ह्यात सर्वाधिक लोणगाव या गावात 200 हेक्टर जमीनीवर रताळ्याची लागवड करण्यात आलेली अाहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून लोणगावचे शेतकरी रताळ्याची लागवड करीत आहे. दिवसेंदिवस लागवडीचे क्षेत्रफळ वाढत आहे. जुलै महिन्यात लागवड केलेले रताळे फेब्रुवारी महीन्यात काढणीला येतात. महाशिवरात्रीच्या उपवासाला फराळ म्हणून बाजारात रताळीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून महाशिवरात्रीपूर्वी रताळ्यांची काढणी केली जाते. हे पीक कमी खर्चात आणि कमी वेळेत हलक्या प्रतीच्या जमिनीत उत्तम प्रकारे येते. सध्या सर्वत्र रताळी काढणीला वेग आला आहे.

टॅक्ट्रर तर, काहीजण बैलजाोडीच्या साह्याने रताळी काढीत असून, पोत्यामध्ये भरत आहे. गतवर्षी रताळ्याला 1800 ते 2000 रूपये क्विंटलचा भाव होता. तर हेक्टरी 250 क्विंटल उत्पन्न निघाले होते. मात्र, आता रताळ्याला एक हजार ते बाराशे रूपये भाव मिळत असून, हेक्टरी 150 क्विंटल उत्पन्न निघत आहे. यंदा भावात घसरण होऊन उत्पादनात घट झाली आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं...
‘छावा’ सिनेमामुळे निर्मात्यांना झालेल्या फायद्याचा आकडा ऐकलात का? ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांना देखील टाकले मागे
संजय राऊत यांच्याशी मी सहमत, नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका
चंद्रपुरात ओबीसीकडून निषेध आंदोलन, सरकारच्या निर्णयाचा विरोध
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, एकाची हत्या; मुख्य आरोपीला पंजाबमधून अटक
महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य
Champions Trophy 2025 – रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसची चाहत्यांना चिंता, श्रेयस अय्यरने दिली महत्त्वाची अपडेट