विक्रमगडमध्ये तिखट मिरचीचा ‘गोडवा’, दर आठवडा 1 टन उत्पादन; एक एकरात केली किमया

विक्रमगडमध्ये तिखट मिरचीचा ‘गोडवा’, दर आठवडा 1 टन उत्पादन; एक एकरात केली किमया

काळ्या आईची योग्य ती सेवा केली तर हातात भरभरून दान पडते याची प्रचिती विक्रमगड येथील शेतकऱ्याने घेतली आहे. कुंझें गावातील रहिवासी राजू दुमाडा यांनी एक एकरात मिरचीची अडीच हजार रोपे लावली. पाण्याचे नियोजन, मेहनत आणि मशागत यामुळे दर आठवड्याला एक टन उत्पादन मिळत असल्याने तिखट मिरचीला गोडवा आला आहे. त्यांनी अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. वाफे पद्धतीचा राजू यांनी अवलंब केला असून त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी येत आहेत.

तालुक्यातील कुंझें गावातील दुमाडपाड्यात राजू दुमाडा हे शेतकरी राहतात. जानेवारी महिन्यात दुमाडा यांनी एक एकरमध्ये अडीच हजार मिरचीची रोपे लावली. प्रत्येक रोपामध्ये पुरेसे अंतर ठेवले. योग्य मशागत, खते आणि पाण्याचे नियोजन केले. साधारण दीड महिन्यात मिरचीचे उत्पादन मिळू लागले. आठवड्याला एक टन मिरचीचे उत्पन निघते. वाशी येथील बाजारात मिरचीची विक्री केली जाते. मिरचीला बाजारात प्रतिकिलो 50 ते 60 रुपये भाव आहे. वाशीतील व्यापारी मिरची घेण्यासाठी गावात येत असल्याने वाहतुकीचा खर्च होत नाही. औषधे, सेंद्रिय खते, मजुरी मिळून 50 ते 60 हजारांचा खर्च आला.

दिवसाआड रोपांना पाणी…

गेल्या तीन वर्षांपासून मी मिरचीची शेती करतो. यावर्षी दयाल फर्टिलायझर्सची खते वापरली. कृष्णा काटकरी यांनी या खताची माहिती दिली. त्यामुळे यंदा चांगला फायदा मिळाला असून उत्पादन वाढले आहे. उष्णता जास्त असल्याने दोन दिवसातून एकदा पाणी द्यावे लागते असे शेतकरी राजू दुमाडा यांनी सांगितले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं...
‘छावा’ सिनेमामुळे निर्मात्यांना झालेल्या फायद्याचा आकडा ऐकलात का? ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांना देखील टाकले मागे
संजय राऊत यांच्याशी मी सहमत, नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका
चंद्रपुरात ओबीसीकडून निषेध आंदोलन, सरकारच्या निर्णयाचा विरोध
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, एकाची हत्या; मुख्य आरोपीला पंजाबमधून अटक
महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य
Champions Trophy 2025 – रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसची चाहत्यांना चिंता, श्रेयस अय्यरने दिली महत्त्वाची अपडेट