डोंबिवलीत मराठी भाषेची अवहेलना, दुकानाच्या पाट्या गुजरातीत; महायुती सरकारने केले महाराष्ट्राचे गुजरातीकरण

डोंबिवलीत मराठी भाषेची अवहेलना, दुकानाच्या पाट्या गुजरातीत; महायुती सरकारने केले महाराष्ट्राचे गुजरातीकरण

महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवल्यानंतर आता राजरोसपणे महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरू आहे. मराठी संस्कृतीचा गंध असलेल्या डोंबिवलीत मराठी भाषेची अवहेलना करणारा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी आदेश धाब्यावर बसवून राजरोसपणे दुकानावर गुजराती भाषेतील फलक आणि पाट्या लावल्या जात आहेत. जाणीवपूर्वक मराठी भाषा हद्दपार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

डोंबिवली पूर्वेतील वीर सावरकर रोडवर एका दुकानाने प्रमुख नामफलक गुजराती भाषेत लावला आहे. घोघरी जैन समाजाच्या वतीने चालवले जाणारे हे दुकान त्यांच्या समाजातील लोकांना स्वस्त दरात किराणा सामान पुरवते. त्यामुळे या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठीत असले पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे केडीएमसीचे सक्त आदेश आहेत. परंतु या दुकानाने नियम डावलत गुजराती पाटी लावल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा...
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग
मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?