भारत-पाकिस्तान मॅचनंतरच्या ट्विटमुळे जावेद अख्तर ट्रोल; थेट म्हणाले ‘देशप्रेम काय असतं हे..’

भारत-पाकिस्तान मॅचनंतरच्या ट्विटमुळे जावेद अख्तर ट्रोल; थेट म्हणाले ‘देशप्रेम काय असतं हे..’

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली. विराट कोहलीने 111 चेंडूत नाबाद 100 धावा अशी अप्रतिम खेळी केली. या विजयानंतर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंची प्रशंसा केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक जावेद अख्तर यांनीसुद्धा विराटसाठी खास पोस्ट लिहिली. ‘विराट कोहली, जिंदाबाद! आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे’, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. मात्र जावेद यांच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी नकारात्मक टिप्पण्या केल्या. तेव्हा आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जाणारे अख्तर यांनीसुद्धा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

‘जावेद, बाबर का बाप कोहली है. बोलो, जय श्रीराम (जावेद, बाबरचा बाप कोहली आहे, बोला जय श्रीराम)’ अशी कमेंट एका युजरने केली. जावेद अख्तर यांच्या धर्मावर निशाणा साधत ही कमेंट करण्यात आली होती. त्यावर नेटकऱ्याला सुनावत अख्तर यांनी लिहिलं, ‘मी तर फक्त हेच म्हणेन की तू एक नीच व्यक्ती आहेस आणि नीच म्हणूनच मरशील. देशप्रेम काय असतं हे तुला काय माहिती? ‘

कोहलीचं कौतुक केल्याबद्दल आणखी एका युजरनेही जावेद अख्तर यांना टोमणा मारला. ‘आज सूर्य कुठून उगवला आहे? आतून तुम्हाला दु:ख होत असेल ना’, अशी कमेंट त्या युजरने केली. अख्तर यांनी या नेटकऱ्यालाही स्पष्ट शब्दांत सुनावलं. “बेटा, जेव्हा तुझे वडील, आजोबा इंग्रजांचे बूट चाटायचे तेव्हा माझे वडील-आजोबा देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात आणि काळ्या पाण्याच्या शिक्षेत होते. माझ्या नसानसांत देशप्रेमींचं रक्त आहे आणि तुझ्या नसानसांत इंग्रजांच्या नोकरांचं रक्त आहे. या फरकाला विसरू नकोस”, अशा शब्दांत अख्तर यांनी सुनावलं. जावेद अख्तर यांनी अशा पद्धतीने नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला उत्तर द्यायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा टीका करणाऱ्यांना फटकारलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवल्याने भारताचं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं असून पाकिस्तानचा संघ गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुबई इथं झालेल्या या सामन्यात पाकिस्तानला 241 धावांत रोखल्यानंतर भारताने 42.3 ओव्हरसमध्ये 4 बाद 244 धावा करत विजय साकारला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं...
‘छावा’ सिनेमामुळे निर्मात्यांना झालेल्या फायद्याचा आकडा ऐकलात का? ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांना देखील टाकले मागे
संजय राऊत यांच्याशी मी सहमत, नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका
चंद्रपुरात ओबीसीकडून निषेध आंदोलन, सरकारच्या निर्णयाचा विरोध
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, एकाची हत्या; मुख्य आरोपीला पंजाबमधून अटक
महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य
Champions Trophy 2025 – रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसची चाहत्यांना चिंता, श्रेयस अय्यरने दिली महत्त्वाची अपडेट