पुरे झाले आता, हे कुठेतरी थांबले पाहिजे; प्रार्थनास्थळ कायद्यासंबंधी नवीन याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

पुरे झाले आता, हे  कुठेतरी थांबले पाहिजे; प्रार्थनास्थळ कायद्यासंबंधी नवीन याचिकांवरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

पुरे झाले आता, याला काहीतरी मर्यादा असते, हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने प्रार्थनास्थळकायद्यासंबंधी दाखल नवीन याचिकांवरून फटकारले. तसेच कोणत्याही नवीन याचिकांवर सुनावणी होणार नाही असे दरडावले. दरम्यान, याप्रकरणी प्रलंबित याचिकांवर एप्रिलमध्ये तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल असेही स्पष्ट केले.

प्रार्थनास्थळ अधिनियम 1991 या कायद्याच्या वैधतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या नवीन याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या सर्व याचिका फेटाळून लावल्या.

नेमके काय प्रकरण?

प्रार्थनास्थळ कायद्याच्या वैधतेप्रकरणी अश्विनी उपाध्याय यांनी मूळ याचिका दाखल केली होती, परंतु गेल्या वर्षी न्यायालयाने हिंदू पक्षकारांद्वारे दहा मशिदींची जागा परत मिळण्यासाठी दाखल केलेल्या 18 याचिकांवरील सुनावणी थांबवली आणि मंदिर तसेच मशिद वादाशी संबंधित सर्व प्रकरणे एकत्र केली. यात शाही ईदगाह-कृष्ण जन्मभूमी, काशी विश्वनाथ- ज्ञानवापी मशिद आणि संभल मशिद वाद यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे...
‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष
दृश्यम- 3 लवकरच येणार साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!
Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल
जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे यांची मागणी