द्वारकानाथ संझगिरी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी 9 फेब्रुवारीला सभा

द्वारकानाथ संझगिरी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी 9 फेब्रुवारीला सभा

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरींच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी रविवारी 9 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही आदरांजली सभा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.

‘पप्पू’ या टोपण नावाने मित्रांमध्ये, चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या संझगिरींनी आपल्या पाच दशकांच्या लेखन प्रवासात हजारो लेख, शेकडो संगीताचे प्रयोग, शेकडो एकपात्री कार्यक्रम आणि 40 पुस्तकांचा खजिना आपल्या चाहत्यांना दिला. आपले सारे आयुष्य मनमुरादपणे जगलेल्या या ‘अवलिया’ विषयी गेल्या दोन दिवसात हजारो चाहत्यांनी, मित्रांनी सोशल मीडियावर भन्नाट आठवणी आणि किस्से व्यक्त केलेत. यावरून त्यांचे लेख, त्यांचे कार्यक्रम प्रत्येकाच्या मनावर किती अधिराज्य गाजवत होते, याची कल्पना सर्वांना आली आहे. तसे पाहता संझगिरी हे सर्वांचेच लाडके होते. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वांनाच आमंत्रण दिले आहे आणि आपल्या आठवणींना उजाळा देण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी...
ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड
भारतात स्त्री सुरक्षा वाऱ्यावर? भूमी पेडणकर म्हणते, ‘भारतात महिला म्हणून वावरायला भीती वाटते…’
प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..