‘कहानी ते मर्दानी’ महिला अभिनेत्रींचा ठसा कायम, तिकीटबारीवरही खणखणाट
अभिनेत्री विद्या बालन हिने 'द डर्टी पिक्चर' (२०११) आणि 'कहानी' (२०१२) या चित्रपटांद्वारे बॉलीवूडवर डंका वाजवला आहे. साऊथची सी ग्रेट अभिनेत्री सिल्क स्मिता हीच्या आयुष्यावरील हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या देखील यशस्वी ठरला होता.
अभिनेत्री तापसी पन्नू हीने आपल्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी महिला केंद्रीत चित्रपटांना मार्केट मिळवून दिले. तापसी हिने 'नाम शबाना' (२०१७), 'सांड की आंख' (२०१९) आणि 'थप्पड' (२०२०) या चित्रपटांद्वारे स्वतःचा वेगळा प्रेक्षक निर्माण केला.
अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या 'राजी' (२०१८) आणि 'गंगूबाई काठियावाडी' (२०२२) या चित्रपटांनी महिला-प्रधान ब्लॉकबस्टर चित्रपटांचा मार्ग आणखी मजबूत केला.विद्या, राणी, तापसी आणि आलिया - या अभिनेत्रींनी दाखवून दिले आहे की चांगला अभिनय आणि ताकदवान कथा प्रेक्षकांना भावत मग ती भूमिका स्रीने केलेली असो वा पुरुषाने असे चित्रपट चालतातच.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List