‘मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?’, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले

‘मग आम्ही काय मारामाऱ्या करायच्या का?’, त्या भेटीची चर्चा अन् भुजबळ चांगलेच संतापले

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्येकवेळी जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली. दोघांमध्ये तब्बल तीस मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली आहे. या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

बंद दाराआड चर्चा  

अजित पवार यांना भेटण्यासाठी जेव्हा जयंत पाटील हे त्यांच्या कक्षात आले, तेव्हा तिथे गर्दी होती. जयंत पाटील कक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तिंना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड जवळपास तीस मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे, या भेटीवर आता छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आज अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जवळपास तीस मिनिटांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली. यावर आता भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमची भेट रोजच होते, विधानसभेतही होते. मग आम्ही काही मारामाऱ्या करायच्या का? प्रत्येक जण विधानसभेत एकमेकांना भेटतो, हाल हवाल विचारतो. राजकारणात आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकांचे शत्रू नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकीची देखील घटना घडली, या घटनेत पोलीस देखील जखमी झाले. यावर देखील यावेळी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस पोलिसांचं काम करत आहेत. जो चुकला असेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. सक्तीची कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांनी हे विधानसभेत देखील सांगितलं आहे. असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच कोरटकर वर्षावर असतील तर संजय राऊत यांनी तेथे जाऊन कोरटकरांना घेऊन यावे, असा टोलाही यावेळी भुजबळ यांनी लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गर्भाशयातून डॉक्टरांनी काढला तब्बल पावणे 17 किलोचा मांसाचा गोळा, आता ती आई होऊ शकणार गर्भाशयातून डॉक्टरांनी काढला तब्बल पावणे 17 किलोचा मांसाचा गोळा, आता ती आई होऊ शकणार
एका महिलेच्या वारंवार ओटी पोटात दुखत होते. पोटाचा घेर देखील वाढत चालला होता. तिला वाटले ती गर त्यामुळे डॉक्टरांनी तिची...
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेनेच्याच महिला कार्यकर्तीने भर रस्त्यात चोपलं
रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ‘भाभीजी घर पर है’च्या लेखक, अभिनेत्याचा मृत्यू; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
अथिया शेट्टी आणि केएल राहुल झाले आई-बाबा, घरी लक्ष्मीचे आगमन
सलमान खानच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटामुळे अभिनेत्रीचे करिअर उद्ध्वस्त, एकही चित्रपट चालला नाही
Latur News – शासकीय कामात अडथळा; दाम्पत्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
नागपूरला पेटवण्यात सरकारच जबाबदार, विधानसभेत नाना पटोलेंचा हल्लाबोल