या अभिनेत्रीवर गोविंदाचे घर फोडल्याचा आरोप; गोविंदाने कुटुंब सोडण्यास नकार दिल्याने ब्रेकअप

या अभिनेत्रीवर गोविंदाचे घर फोडल्याचा आरोप; गोविंदाने कुटुंब सोडण्यास नकार दिल्याने ब्रेकअप

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांनाच भूरळ घातली. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच या अभिनेत्रीच्या अफेअर्सचीही तेवढीच चर्चा झाली आहे. एवढंच नाही तर या अभिनेत्रीवर चक्क गोविंदाचं घर फोडल्याचाही आरोप झाला होता.

ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. राणीचे सर्वच अफेअर्स फोल ठरल्यानंतर अखेर तिने इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध निर्मात्याशी लग्न केलं. राणीच्या लग्नाची बातमी ऐकून तिचे चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. मोठी गोष्ट म्हणजे आजपर्यंत कोणीही त्यांच्या लग्नाचे फोटोही पाहिलेले नाहीयेत.तिचे प्रेम जीवन नेहमीच चर्चेत राहिले आहे . तिचे लग्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आदित्य चोप्राशी झाले आहे. त्यांनी हे लग्न इतके गुप्तपणे केले होते की कोणालाही त्याची माहिती मिळाली नव्हती.

राणीचे अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले

राणी मुखर्जीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून केली. चित्रपटाला काही खास प्रतिसाद मिळाला नव्हता पण तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर आमिर खानसोबत ‘गुलाम’ या चित्रपटाने तिचं नशीबच चमकलं. चित्रपटातील ‘आती क्या खंडाळा’ या गाण्यानंतर राणी मुखर्जीच्या अभिनय कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळाली.

आमिर खान आणि अभिषेक बच्चनसोबत राणीच्या अफेअर्सच्या चर्चा

राणी मुखर्जीचा चित्रपट आल्यानंतर तिचे नाव आमिर खानशीही जोडले गेले होते . या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांचीही खूप चर्चा झाली. राणी मुखर्जीने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की ती आमिर खानवर खूप करते मात्र त्यानंतर त्यांच्या नात्याचं पुढे काही झालं नाही. त्यानंतर तिचं नाव अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या अफेअरबद्दलही बरीच चर्चा झाली. त्यांचे नाते हे लग्नापर्यंत गेले होते असही म्हटलं जातं. दोघांनी ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि नंतर ते दोघेही वेगळे झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rani Mukerji (@ranimukherjichopraa)


गोविंदासोबत अफेअर आणि घर फोडल्याचा तिच्यावर होणारा आरोप 

पण राणीचे नाव जर कोणासोबत जास्त चर्चेत आलं तर ते गोविंदासोबत. 2000 साली राणी आणि गोविंदाने ‘हद कर दी आपने’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट खूप हिट ठरला. यानंतर, राणी आणि गोविंदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यानंतर त्यांच्याही अफेअरच्या चर्चा येऊ लागल्या. तसेच राणीवर गोविंदाचे घर उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला. असे म्हटले जाते की गोविंदा राणीशी लग्न करण्यास आणि त्याचे कुटुंब सोडण्यास तयार नव्हता, यामुळेच त्यांचे नाते तिथेच संपले. पण त्यांच्या नात्यांच्या चर्चा आजही होतात आणि त्यानंतर पुन्हा राणी-गोविंदाने एकत्र काम करणही टाळलं.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे? महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे?
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर सनसनाटी आरोप केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु...
‘एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर रात्रीतून स्टार बनली, त्यानंतरही ही अभिनेत्री ठरली ‘कास्टिंग काउच’ची शिकार
Pune News – पुण्याच्या नाना पेठेत लाकडी वाड्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू
चंद्रपूर भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर, फडणवीसांच्या काकीने मुनगंटीवारांना दिल्या कानपिचक्या
Train Incident – उज्जैनजवळ बीकानेर-बिलासपूर एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये घबराट