शेतकऱ्यांवर बळजबरी करू नका, शिवसेनेने उचलला शक्तीपीठचा मुद्दा

शेतकऱ्यांवर बळजबरी करू नका, शिवसेनेने उचलला शक्तीपीठचा मुद्दा

शक्तिपीठाच्या नावाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पाणभरती शेतजमिनी अधिगृहित केल्या जात आहेत. एकीकडे महाराष्ट्रात कृषीक्षेत्र मोठय़ा प्रमाणावर घटते आहे, तर दुसरीकडे शेतजमिनी मोठय़ा प्रमाणावर ताब्यात घेतल्या जात आहेत. सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरी करू नये, अशी मागणी शिवसेनेने  आज लोकसभेत केली. शिवसेना खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात शक्तिपीठाचा मुद्दा उपस्थित केला. तिरूपती बालाजी, हैदराबादला जाण्यासाठी रस्ता जोडला जावा. त्यामुळे तिरूपतीला जाण्यासाठी मराठवाडय़ासह विदर्भातील लोकांची सोय होईल. परभणी ते पुणे, परभणी ते संभाजीनगर रस्ता सहापदरी करावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी या वेळी केली. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी करत असलेल्या कामाची प्रशंसा करताना जाधव यांनी संत तुकारामांचा ‘शुद्ध बीजापोटी’ हा अभंग सभागृहात म्हणून दाखविला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘महाराष्ट्र एकीकरण’चे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप ‘महाराष्ट्र एकीकरण’चे नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव, सीमाभागातील मराठी भाषकांमध्ये तीव्र संताप
भाषिक तेढ निर्माण करणे आणि गट तयार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण...
साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण
कोरटकरला न्यायालयीन कोठडी
नवीन वर्षात गुढी उभारायची आहे, कामाला लागा! उद्धव ठाकरे यांचे रणशिंग
अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होतेय, सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही घटनाविरोधी; निवृत्त न्यायमूर्तीगौतम पटेल कडाडले
लोकशाही मार्ग कुणालाच सोडता येणार नाही, संविधानावर आघात केला तेव्हा इंदिरा गांधींनाही जनतेने पराभूत केले – शरद पवार
बाजारात उत्साहाची दडी, महागाई गगनाला भिडली, मुंबईकरांनी फक्त परंपरा जपली; मुहूर्ताला सोने खरेदीत 50 टक्क्यांची घट