Mumbai Crime News – एक वर्षापूर्वीच प्रेमविवाह, घरगुती वादातून पत्नीला संपवले, आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
घरगुती वादातून पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली. रेखा खातून उर्फ रबिया शेख असे मतय महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला. मात्र गोरेगाव पोलिसांनी कसून शोध घेत रविवारी रात्री आरोपीला अटक केली.
रेखा उर्फ रबियाही मूळची कोलकात्याची असून वर्षभरापूर्वीच तिचा आरोपीसोबत प्रेमविवाह झाला होता. नोकरीसाठी दोघे पती-पत्नी सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आले होते. राम मंदिरजवळ दोघे भाड्याच्या खोलीत राहत होते आणि मजुरीची कामं करत होते.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. रविवारी रात्रीही दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने पत्नीला मारहाण सुरू केली. यावेळी रेखा आरडाओरडा करत असल्याने त्याने तिच्या तोंडात टॉवेल कोंबला. यानंतर तिला नाक, तोंड, डोळ्यावर मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी दरवाजाला बाहेरून कुलूप लावून पळून गेला. काही वेळाने त्याने ओळखीतल्या राखी शेख या महिलेला फोन करून आपण पत्नीची चुकून हत्या केल्याचे कबूल केले. यानंतर राखीने तात्काळ रेखाच्या घरी धाव घेतली. दरवाजा उघडून पाहिले असता रेखा बेशुद्धावस्थेत आढळली. राखीने तिला तात्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
राखी शेखने गोरेगाव पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. राखीच्या जबाबावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. कसून शोध घेत रविवारी रात्री उशिरा आरोपी रॉयल शेखला अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List