नागपुरातील घटनेला सरकार जबाबदार, नागपूरकरांनी शांतता बाळगावी – अंबादास दानवे

नागपुरातील घटनेला सरकार जबाबदार, नागपूरकरांनी शांतता बाळगावी – अंबादास दानवे

नागपुरात ज्यापद्धतीने परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर केली आहे. नागपुरातील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले असून दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. या दगडफेकीत पोलीसही जखमी झाले आहेत. यावरच आपली प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले आहेत की, ”गेल्या काही दिवसांपासून राज्याचे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच असं वातावरण चिघळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ज्यामुळे राज्यात हिंदू-मुस्लीम वातावरण निर्माण होईल. हिंदूंच्या मनात वेगळी भीती, मुस्लीमांच्या मनात वेगळी भीती निर्माण होऊन दंगल होईल, राज्य सरकार स्वतःच्या या उद्दिष्टात यशस्वी झालं आहे. पण जनतेने, ज्यात हिंदू असतील किंवा मुस्लीम असतील, त्यांनी सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये. आपण शांतता बाळगावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

1 एप्रिलपासून टीडीएसच्या नियमात बदल होणार 1 एप्रिलपासून टीडीएसच्या नियमात बदल होणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट 2025 मध्ये टीडीएस आणि टीसीएस नियमांत बदल केले आहेत. 1 एप्रिल 2025 पासून...
बोगस मतदार यादीच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग, 267 अंतर्गत चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळली
काहीही हं! हिंदुस्थानात उरले फक्त 4 टक्के गरीब
व्हेंटिलेटरवर असलेली रेल्वेही आता मित्राला देणार का? विरोधकांनी लोकसभेत रेल्वेमंत्र्यांना घेरले
शेअर बाजार सोमवारी सावरला रे!
10 वर्षांत बँकांनी 16 लाख कोटींच्या कर्जावर सोडले पाणी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत धक्कादायक माहिती
कानपूरमध्ये सायबर चोरालाच 10 हजार रुपयांना गंडवले