पारा चढला, सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा; तलाव, विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट

पारा चढला, सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा; तलाव, विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा चांगला आहे. अद्याप अर्धा पाणीसाठा असला तरी गेल्या महिन्याभरातील पाणीसाठ्यात झपाट्याने घसरण होत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत 23 टक्के जादा साठा असल्याची बाब दिलासादायक आहे. परंतु, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने तलाव, विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. अद्याप टँकरची मागणी नसली तरी जिल्ह्यातील काही तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. येत्या आठवड्याभरात दुष्काळी भागातून टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरले जाण्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यानंतरही बराच काळ ढगाळ हवामान राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली होती. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे तलावात पाणीसाठा वाढला होता; परंतु या भागात बागायती क्षेत्र वाढल्याने पिकांना पाणी देण्यासाठी उपसाही वाढला आहे. त्यामुळे पाणीपातळी घटली आहे.

यंदा जिल्ह्यात उन्हाळी पावसाने दडी मारली, त्यातच वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळीही कमी होऊ लागली. पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी केला. दुष्काळी पाण्यासह अन्य तालुक्यातही उन्हाळी पावसाने दडी मारली, त्यामुळे पाणीटंचाईचे सावट आले आहे. त्यातच मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठाही कमी होत चालला आहे.

दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे. परंतु, प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी 51 टक्के असली तरी महिन्याला 10 ते 11 टक्क्यांनी पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे. सिंचन योजनाद्वारे तालुक्यातील सर्व तलाव पुन्हा भरून घ्यावेत, अशी मागणी आहे. दुष्काळी भागात शेती, जनावरांसाठी व पिण्यासाठीच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे. अद्याप टँकरची मागणी मात्र झालेली नाही.

जत पूर्वमध्ये टंचाईची स्थिती असून, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी या तालुक्यांना सिंचन योजनांचा दिलासा आहे; मात्र पाणी वाटपात काटेकोर नियोजनाची गरज आहे. हे नियोजन पोटकालवे, शाखा कालव्यांपर्यंत व्हायला हवे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता मार्चपासून जत पूर्वभागात टंचाईबाबत उपाययोजना कराव्या लागतील.

वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र, सर्वत्रच भूजल पातळी कमी झाल्याने टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात उन्हाळी पेरणी सुरू होणार आहे.

टंचाई आराखड्याची कार्यवाही सुरू

 ■ गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही यंदा टंचाई जाणवत आहे. सद्यः स्थितीत जिल्ह्यातील 40 गावांना पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मे आणि जून महिन्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे, याबाबतचा संभाव्य टंचाई आराखडा तयार केला जात आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस 

मागीलवर्षी जूनमध्ये टंचाईची तीव्रता वाढली होती. मात्र, त्यानंतर पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाली. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समाधानकारक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात तब्बल 164 टक्के पावसाची नोंद झाली होती. जत तालुक्यात 130, खानापूर 140, कडेगाव 143 टक्के वगळता उर्वरित तालुक्यांमधये 175 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा – दिलीप वेंगसरकर पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा – दिलीप वेंगसरकर
तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटपटू होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत...
चंद्रपूर जिल्हा शिवसेना पदाधिकारी जाहीर
जेएनपीटीला जोडणाऱ्या सहापदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी
दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका
Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…