सामान्य माणूस असणं गुन्हा आहे, मंत्री असल्यास सगळी यंत्रणा कामाला लागते; बीड प्रकरणावरुन दमानियांचा सरकारवर निशाणा

सामान्य माणूस असणं गुन्हा आहे, मंत्री असल्यास सगळी यंत्रणा कामाला लागते; बीड प्रकरणावरुन दमानियांचा सरकारवर निशाणा

सामान्य माणूस असणं गुन्हा आहे, मंत्री असल्यास सगळी यंत्रणा कामाला लागते, असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, यासाठी धनंजय देशमुख यांनी मस्साजोग येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना X वर एक पोस्ट करत त्या असं म्हणाल्या आहेत.

आपल्या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, ”आज मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना बघून खूप दुःख होतंय. सामान्य माणूस असणं गुन्हा आहे. तुम्ही मंत्री-संत्री असाल तर सगळी यंत्रणा कामाला लागते. तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवारला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागतं. आज तागायत पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला माहिती दिली नाही, 3 महिने होत आले तरी एक आरोपी सापडत नाही.” तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान “या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी...
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा
राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर